अप्रूप …..जुन्या आठवणी





परवा बऱ्याच वर्षांनी माझ्या शाळेत गेलो होतो … फिरता फिरता एक कपाट नजरेस पडलं…… वर लिहिलं होतं .. “हरवले सापडले विभाग” ….. तीच पूर्वीची
जागा .. कपाटही तेच असावं बहुधा …. पण आज ते खूपच खिन्न वाटत होतं …. सुरवातीला वाटलं की कपाटाच्या वयोमानामुळे असेल … पण नंतर नजर त्या कपाटातल्या वस्तूंवर गेली आणि मग त्याची उद्विग्नता नेमकी कशामुळे होती याचा अंदाज आला … आत इतक्या वेगवेगळ्या महागड्या वस्तू , Tupper ware च्या बाटल्या , रुमाल , चित्रकलेच्या वस्तू , पेनं , key chains, कंपास , पेन्सीलचा तर खचंच पडला होता ……. शाळेतल्या बाईंना विचारलं तर त्या म्हणाल्या, आज काल मुलं आपली वस्तू हरवली की विचारतच नाहीत .
कित्येकदा आम्ही वर्गावर्गात जाऊन विचारतो तरी आमचं नाही असं म्हणतात .

कदाचित घरी गेल्यावर ती वस्तू काही मिनिटात त्यांच्या हातात येऊन पडत असेल . याला कारणं अनेक असतील. उंचावलेला आर्थिक स्तर , जे आपल्याला मिळालं नाही तर ते आपल्या मुलांना मिळावं ही वारसा हक्कानी मिळालेली विचारसरणी, कुटुंब छोटी झाल्याने एकाच्याच वाट्याला येणारे सगळे लाड आणि अशी अनेक कारणं …. ही कारणं त्या त्या ठिकाणी योग्य असतीलही…….पण ….

पूर्वी आमचा साधा Eraser जरी शाळेत विसरला ज्याला त्या काळी आम्ही “खोड रबर “ म्हणायचो , तरी दुसऱ्या दिवशी तो याच हरवले सापडले विभागाच्या कपाटात ‘याची देही याची डोळा’ बघत नाही तो पर्यंत होणारी घालमेल , मग ती वस्तू आपलीच कशी आहे , त्यावर पेनानी काढलेला star मीच काढला होता हे पटवून देण्यासाठीची धडपड …. त्यासाठी वेळप्रसंगी मधल्या सुट्टीत वर्गातून आयात करावे लागणारे साक्षीदार …. आणि शेवटी ती हरवलेली वस्तू पुन्हा आपल्या हातात पडली की मिळणारे समाधान …. अशा अनेक गोष्टींमधली गंमत ही आजकालच्या मुलांना माहितीच नाहीये . आम्ही एका वेळेस १-२ पेन्सिल्स घ्यायचो , आता अख्खा box घेतो … आधीच्या वर्षीच्या वह्यांमधली उरलेली पानं फाडून त्याचं binding करुन ती रफ वही म्हणून आनंदानी वापरायचो आता वेगवेगळ्या design च्या वह्या घेतो …… जुन्या जाड कॅलेंडर ची पानं कव्हर म्हणून घालायचो आता Plastic Coated वगैरे वगैरे … एकंदरीत लक्षात आलं कि आजकालच्या मुलांना कसलं अप्रूपच राहिलं नाहीये . अप्रूप ………..खरंच… सगळ्याच्या व्याख्याच बदलल्यात आता …… पण या घटनेनी मला मात्र Flashback मध्ये नेलं…




खडूंचा पूर्ण भरलेला box बघण्याचं अप्रूप …..
तो रंगीत खडूंचा असेल तर जरा जास्तंच अप्रूप……
बाईंनी खडू आणायला पाठवलेल्या मुलाने हळूंच खिशातून स्वतःसाठी आणलेला एक खडू सगळ्या वर्गाला World Cup जिंकल्याच्या थाटात दाखवण्याचं अप्रूप…..
धडपडल्यावर गुलाबी-लाल रंगाचं औषध लावून घेण्याचं अप्रूप…..
Lab मधल्या काकांना मस्का मारून Litmus Paper ढापण्याचं अप्रूप….
हस्तकलेच्या वेळेस हाताला चिकटून वाळलेल्या फेविकॉलचे पापुद्रे काढण्याचं अप्रूप……
स्पोर्ट्स च्या वेळेस एखाद्याला काही कारणास्तव ग्लुकॉन डी दिलं कि त्याचं अप्रूप….
gathering च्या practice साठी एकाचा टेप रेकॉर्डर घेऊन दुसऱ्याच्या घरी जाण्याचं अप्रूप….आणि बरंच काही…

आजच्या जमान्यात “फालतू” वाटणाऱ्या अशा अनेक साध्या साध्या गोष्टी आम्ही जगलो होतो आणि खूप enjoy केल्या होत्या .

त्या हरवले सापडले कपाटातल्या हरवलेल्या वस्तू त्या त्या मुलांना सापडल्या नसल्या तरी मला मात्र त्या कपाटामुळे माझ्या “हरवलेल्या अनेक जुन्या आठवणी सापडल्या” …

तेवढ्यात लक्ष घड्याळ्याकडे गेलं … मी भूतकाळातून वर्तमानात आलो आणि लगेच तिकडून निघालो … बाहेर एक मित्र भेटला …. घाईत होता … त्याचा मुलगा काल शाळेत colour box हरवून आला होता .. त्यामुळे नवीन घ्यायला चालला होता …..

क्षितिज दाते



A very nice article written by Nana Patekar in his blog

एक पिढी शिक्षण घेऊन गाढव बनली आणि आता नवी पिढी शिक्षण घेताना रेसचा घोडा बनत आहे.

परीक्षेत १००% पाहिजेत, कराटे क्लासमध्ये Black बेल्ट मिळवायचा आहे.
त्यानंतर Dance क्लास attend करायचा. भगवतगीता स्पर्धेत जायचं आहे. श्लोकांचा अर्थ कळला नाही तरी ते तोंडपाठ करायचेच.
कारण first prize मिळालंच पाहिजे !!
मग drawing competition असते. तिथून बाहेर निघाला की चालला तबला वाजवायला… संगीत विशारद बनायला.

Albert Einstein बनवून देणाऱ्या Multi -National School आल्या. पण Albert हा Einstein बनण्यासाठी शाळेत गेला नव्हता.
एक अमिताभ बनला तर हजारो acting school उभ्या राहिल्या. पण अमिताभ अभिनेता बनण्यासाठी कोणत्याही School मध्ये गेला नव्हता.
आता लवकरच मोदी तयार करणाऱ्या शाळा उभ्या राहतील. आणि पालक लाखो रुपये फी भरून त्यात मुलांना पाठवतील.
आज मुलाच्या शिक्षणासाठी जेवढा खर्च एका वर्षाला होतो, तितके रुपये त्याच्या पालकांना संपूर्ण शिक्षण घेण्यासाठी सुद्धा लागले नाहीत.

आता शाळा सुरु केल्या आहेत investors नी. मागणी तसा पुरवठा ह्या तत्त्वावर. पालकांना आपल्या मुला-मुलीला रेसचा घोडा बनवायचं आहे,
ही मागणी पाहून जास्तीत जास्त अभ्यास मुलांच्या डोक्यात कोंबायला सुरुवात केली. दप्तराचं आणि पालक-शिक्षकांचं अपेक्षांचं ओझं वाहणारी मुले म्हणजे
चालती बोलती प्रेते बनत चालली आहेत.
जरा शुद्धीवर आली की “what is square of 12?” असं विचारून त्यांचं बालपण चिरडून टाकतात.

श्री मोदी ह्यांनी मुलांना एक प्रश्न विचारला होता-”
तुमच्यापैकी किती जण घाम गळेपर्यंत खेळतात?” तेव्हा एकाही मुलाने हात वर केला नाही.
कारण आता मुले AC मध्ये जन्म घेतात, AC मध्ये वाढतात. चिप्स खातात, soft ड्रिंक पितात आणि mobile वर game खेळत बसतात.
ऊन, पाऊस, वारा ह्याच्याशी संबंध येत नाही.
पडणं-लागणं, खेळात हरणे माहीतच नाही. School bus आली नाही तर शाळेपर्यंत चालत जाण्याची ताकद मुलांमध्ये नाही.
वय वर्ष ६ पार होत नाही तर डोळ्याला चष्मा लागतो. हात पायांच्या एक तर काड्या होतात नाहीतर लठ्ठपणा वाढतो.
कारण शारीरिक कष्ट संपले आणि Modified food starch, maltodextrin, hydrolyzed corn gluten, disodium inosinate/ guanylate, yeast extrac, hydrolyzed soy protein मिसळलेले पदार्थ खाणे सुरु झाले. ह्या ingredients ची खासियत म्हणजे ते मुलांच्या पोटात शिरून जास्त काळ टिकतात आणि पोटातील पोषके शोषून घेतात. मुलांची
hormonal आणि जैविक वाढ रोखतात.
ज्यामुळे मुले दुबळी होत जातात. हे घटक पिझ्झा-बर्गरमध्ये असतात.
म्हणून भारत लवकरच diabetes चे सर्वाधिक रुग्ण असलेला देश बनणार आहे. सोबत इतरही विकार येत आहेत.

शेंगदाणे, चणे, रवा, तांदूळ, बाजरी, सुका मेवा आणि फळे ह्यात घातक ingredients नसतात.
लापशी, सातू, शिरा, पोहे किंवा अंड्याचे घरी बनवलेले पदार्थ मुलांना उत्तम पोषण पुरवतात.
ते मिळत नसल्यामुळे मुलांची शारीरिक वाढ नीट होत नाही. प्रतिकार क्षमता संपते. मग vitamins , DHA , minerals देणारे product विकत आणून ते खायला
देतात. वास्तविक, शरीर हा जगातील सर्वात मोठा कारखाना आहे. ह्याच शरीराला योग्य आहार, कष्ट मिळाले तर कुठेही तयार न होऊ शकणारं रक्त
तयार होतं. साध्या भाज्या,अस्सल भारतीय जेवण मिळालं की शरीराची यंत्रणा स्वतः काम करते.
म्हणून ताज्या भाज्या, भाकरी खाणारी आणि मिनरल्स, calcium , proteins माहीत नसलेली माणसे १०० वर्षे जगली
आणि हे माहीत झालेली माणसे फक्त ६० वर्षे जगतात…तेही अनेक रोग सोसत, औषधे घेऊन !!

खेळ, व्यायाम, भटकंती आणि दर्जेदार वाचन न केल्यामुळे मुलांना मानसिक कमतरता जाणवते.
संघर्ष माहीत नसतो आणि team work कळत नाही. मित्र फक्त WhatsApp , face बुक वर भेटतात. प्रत्यक्ष भेट नाही.
सुख-दुःखाची देवाण-घेवाण नाही आणि मित्राचा-मैत्रिणीचा मानसिक आधार नाही. दिलखुलास हसणे आणि ओक्साबोक्शी रडणे मानसिक आरोग्यासाठी चांगले असते. ह्या दोन्ही
क्रिया मुलांना करता येत नाहीत. आपोआपच, जरा मनाविरुद्ध घडलं की लहान मुले-मुली आत्महत्या करतात. बरीच एकुलती एक मुले दुसर्याशी जमवून घेण्याची सवय नसल्यामुळे
पुढे लग्न झाल्यावर वर्षभरात घटस्फोट घेतात. ज्या मुलांना बहीण नसते, चांगली मैत्रीण नसते त्यांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन संकुचित बनतो.
ह्या उणिवांचा शिक्षणात विचार केलेलाच नाही. भारतीय शिक्षण पद्धत सर्वांगीण नाही हे शिक्षण तज्ज्ञ सांगत होते तोवर शिक्षणाचा धंदा सुरु झाला. मोठे उद्योजक, पुढार्यांनी
शाळांमधून गुंतवणूक करून शिक्षण संकल्पनेला धूळ चारली. एखादी स्त्री गरोदर राहिली तर जन्माला येणाऱ्या जीवाच्या admission ची तयारी सुरु होते.
कृष्णाला जन्मण्याआधी मारायची तयारी मामाने केली होती. आता मुल जन्माला येण्याआधी त्याला रेसचा घोडा बनवायची तयारी सुरु होते. आता मुलाने बोलायला सुरुवात केली
की थेट E =MC square म्हणायचं बाकी राहिलं आहे.

अशी मुले सर्व formula पटापट म्हणून दाखवतील पण स्वतःचा formula कधीही शोधू शकणार नाहीत. guitar शिकतील पण स्वतःची संगीत रचना करू शकणार नाहीत.
लता मंगेशकर, सचिन तेंडूलकर, मेरी कोम ह्यांचं अनुकरण अचूक करतील. पण स्वतःची ओळख निर्माण करणार नाहीत.

कारण त्यांना फक्त अनुकरण करायला शिकवलं जातं. जगायची कला, गीत-संगीतातील आनंद, निसर्ग संपदेची भव्यता, नव्या संकल्पनांची निर्मिती, जुन्या विचारांचा आधार,
साहित्य ह्याला बाजारू किंमत नसल्यामुळे फक्त जे विकलं जातं तेच ज्ञान मुलांना मिळतंय, त्यात ते पारंगत होत आहेत. काही जणांना campus मध्ये दर महिना ४ लाखांपेक्षा जास्त
पगार असणारी नोकरी मिळतेय….पण त्यात देशाचं नाही, भांडवलदारांच हित साधला जातंय. पुढची पिढी मोठी पदवी मिळवेल पण न स्वतः जगण्याचा आनंद लुटू शकतील,
न दुसर्याला जगण्याची मजा मिळू देतील…

अगदी हाच धोका ओळखून जपानमध्ये शाळेत AC लावत नाहीत. तिथे मुलांना घोकंपट्टी पेक्षा practical वर भर देतात. वृक्ष-वेली स्वतःच अन्न स्वतः तयार करतात त्या
प्रक्रियेला काय म्हणतात?…असे प्रश्न विद्यार्थ्यांना न विचारता शाळेत व बाहेर भाजी लावायला शिकवतात.
त्या रोपांची-वेलींची जोपासना करायला लावतात.
“निप्पोन technology ” ने केलेल्या तपासणीत म्हटलं आहे की शाळेच्या आवारातील वेलींमुळे तापमान चार अंश कमी झालं आहे.
आणि मुले पाना-फुलांसोबत भावनिक नातं जोडू लागली आहेत. जर्मनी मुलांना Transference शिक्षण देते.
तिथे लहान मुलांची बोटे नाजूक असतात हे लक्षात घेऊन दुसरीपर्यंत लेखन करू देत नाहीत.
पाचवीपर्यंत practical चालतं आणि त्यानंतर विद्यार्थी बँक कर्मचारी बनेल की हवाई सेविका, प्रशासन सांभाळेल की कुशल कामगार होईल ह्याची सतत तपासणी होते.
दहावीनंतर फक्त त्याला आवडणाऱ्या क्षेत्राचं प्रशिक्षण देतात. सगळे एकदम science मध्ये भरत नाहीत. अनावश्यक विषय शिकवत नाहीत. चीन हा cycle प्रेमी देश
४ वर्षाच्या मुलांना cycle चालवण्याचं शिक्षण देतो. त्यानंतर theory कमी आणि प्रत्यक्ष कृती शिकवतात.

प्रत्येक विद्यार्थी उद्या देश चालवणार ह्याचा विचार Netherlands सारखा देशही करतो. एकाच विद्यार्थ्यावर सगळ्या विषयांचा मारा करत नाहीत. चारी दिशांनी अनेक विषय
आणि क्लासचा मारा सोसण्याचे काम भारतीय विद्यार्थ्यांना करावे लागते.

शिक्षण काय असतं?
रवींद्रनाथ टागोर काय म्हणतात पहा. टागोरांची “शांतीनिकेतन” शाळा झाडांखाली भरत असे. पक्ष्यांची किलबिल ऐकू येई.
एकदा टागोर झाडाखाली बसले होते. चार विद्यार्थी त्यांच्या समोर पुस्तकात डोक खुपसून बसली होती.
आणि उरलेली बरीच मुले खेळत-बागडत होती.
कोणी झाडावर चढला होता, कोणी फुलांचा सुगंध घेत फिरत होता.
तेवढ्यात एक पालक तिथे आले. पाहतात तर काय…गुरुदेव शांतपणे बसले होते आणि फक्त चार मुले पुस्तकात डोके खुपसून बसली होती व इतर मुले हसण्यात-नाचण्यात रमली
होती. सुटा-बुटातील पालक महाशय टागोरांना म्हणाले-“या नाचणाऱ्या-बागडणार्या मुलांच्या भवितव्याची तुम्हाला चिंता वाटत नाही का?”
टागोर म्हणाले-
“चिंता वाटते, पण नाचणाऱ्या-बागडणार्या मुलांची नाही तर पुस्तकात तोंड खुपसून बसलेल्या मुलांची.
ही मुले खेळण्या-
बागडण्याच्या वयात मोठ्या माणसांसारखी वागत आहेत. ही मुले लहान वयात प्रौढ झाली आहेत. प्रौढ तर मीसुद्धा अजून झालो नाही.
खरं तर मलाही झाडावर चढावं असं वाटतं. पक्ष्यांशी बोलावंसं वाटतं. भरपूर खेळावंसं वाटतं. पण माझं शरीर आता साथ देत नाही. “
टागोर जगण्यासाठी शिकवत होते. आता शिकण्यासाठी जगावे लागते. जास्त ज्ञान, जास्त कला घेऊन मुले धावत असतात.

आणि पालक त्यांच्यावर पैसे लावतात ! मग एक रेस सुरु होते
आणि जगायचं राहून जातं !!

Lay man’s Thinking – Nice message




An engineer in a car manufacturing company designs a world class car.
The owner is impressed with the outcome and praised him a lot.
While trying to bring out the car from the manufacturing area to the office they realized that the car is few inches taller than the entrance.
The engineer felt bad that he didn’t notice this one before creating the car.
The owner was amazed on how to take it outside of the manufacturing area.
The painter said that they can bring out the car and there will be a few scratches on top of the car that he will do the tinkering later on.
The engineer said that they can break the entrance and after taking the car out, they can cement it.
The owner was not convinced with any ideas and felt like it is a bad sign to break or scratch.

The watchman was watching all the drama and slowly approached the owner.
He wanted to give an idea if they had no problem.
They wondered what this guy would tell them that the experts could not give.

Watchman said that The car is only a few inches taller than the entrance so if they release the AIR in the tyre, the height of the car will be adjusted and can be easily taken out.

Everyone clapped!!

LESSON :
Don’t encounter problems from the expert point of view.
There is always a LAYMAN point that will gives the best solution in a given point of time…
••••••• •••••••• •••••••••

Life issues are also same.

Many a time a friend’s entrance door fall short by few inches, we feel taller!!
Release some air (ego) and adjust the height.
Think simple…
Do simple…
& Live simple.




Steve Jobs Last words




स्टीव्ह जॉब्जचे अखेरचे शब्द –

व्यावसायिक क्षेत्रात मी उत्तुंग यशाची शिखरं गाठली…
इतरांच्या दृष्टीकोनातून माझं आयुष्य आणि यश हे समानार्थी शब्दही झाले…

तरीही, माझ्या कामाव्यतिरिक्त, आनंद जर म्हणाल तर तो मला क्वचितच मिळाला. अखेरीस काय तर, ज्याला मी सरावून गेलो ती माझी संपत्ती माझ्यासाठी केवळ एक सत्यपरिस्थितीमात्र बनून राहीली.

आज या क्षणी, आजारपणामुळं अंथरूणाला खिळलेलं असताना मी माझं सारं आयुष्य आठवून पहातोय. ज्या प्रसिद्धी आणि संपत्तीला मी सर्वस्व मानलं आणि त्यातच वृथा अहंकार जपला ते सगळंच आज मृत्युद्वारी उभं असताना धूसर होत असल्याचं आणि म्हणूनच निरर्थकही असल्याचं मला प्रकर्षानं जाणवतंय.

आज क्षणाक्षणानं मृत्यु जवळ येत असताना, हिरवा प्रकाश दाखवणारी अन् आयुष्यमान वाढवणारी वैद्यकीय उपकरणं माझ्या अवतीभवती दिसत असताना, त्यात असलेल्या यंत्रांचा ध्वनीही मला ऐकू येत असताना, निकट येत असलेल्या मृत्युदेवतेचा श्वासोच्छवासही मला जाणवतोय…

आता माझ्या लक्षात आलंय, भविष्यासाठी पुरेल एवढी पुंजी साठवून झाल्यानंतर, संपत्तीव्यतिरिक्त इतर काहीतरी अधिक महत्वाचं आपण करायला हवं असतं:
त्यात कदाचित् नातीगोती जपणं किंवा एखाद्या कलेसाठी वेडं होऊन जाणं किंवा तारूण्यात पाहिलेल्या एखाद्या स्वप्नाचा पाठपुरावा करणं असं काहीतरी असू शकतं…

सातत्यानं केवळ धनसंचयाच्याच मागे धावण्यामुळे माणूस ‘आतून’ फक्त आणि फक्त पिळवटतच जातो…अगदी माझ्यासारखा…

परमदयाळू परमेश्वरानं आपल्या प्रत्येकाला इंद्रियं दिलीयेत ती इतरांच्या अंत:करणातल्या प्रेमाची जाणिव व्हावी यासाठीच…संपत्तीनं निर्माण होत असलेल्या आभासांच्या आकलनासाठी निश्चितच नव्हे.

आयुष्यभर मी जी संपत्ती, मानमरताब कमावले ते मी कदापिही सोबत नेऊ शकणार नाही…केवळ प्रेमामुळे माझ्या आयुष्यात निर्माण झालेल्या सुखद स्मृती मात्र नक्कीच नेऊ शकेन.

तिच तर खरी संपत्ती…जी आपल्यासोबत येते, आपली पाठराखण करते, आपल्याला बळ देते आणि अंती मार्गदर्शन करेल असा आपल्यापुरता प्रकाशकिरणही देऊ करते.

हजारो मैल विनासायास प्रवास करण्याची शक्ती प्रेमामधे आहे आणि त्यासोबतीनं येणारं जगणंही मग अमर्याद होऊन जातं.

हवं तिथे जा…हवी ती उंची गाठा. हवं ते प्राप्त करण्याची क्षमता आपलं ह्रदय आणि या दोन हातांमधे असते.

जगात सगळ्यात महागडा बिछाना कोणता असतो ते ठाऊक आहे?…”आजारपणाचा बिछाना” …

आपली गाडी चालवण्यासाठी चालक भाड्यानं मिळतो, आपल्यासाठी पैसे कमावून देणारे कर्मचारीही नोकरीला ठेवता येतात…पण आपलं आजारपण सहन करण्यासाठी आपण इतर कोणालाही-कधीही नेमू शकत नाही.

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात. पण एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही…आणि ती असते “आपलं आयुष्य”.

शस्त्रक्रीयेच्या टेबलावर असलेल्या व्यक्तीच्या मनात ‘आपलं केवळ एकच पुस्तक वाचायचं राहिलंय’ ही जाणिव असते…ते पुस्तक असतं “निरोगी जगण्याचं पुस्तक”.

सध्या तुम्ही आयुष्याच्या कोणत्याही स्थितीतून-वयातून जात असलात तरीही, एक ना एक दिवस काळ अश्या वळणावर आणून उभं करतो की समोर नाटकाचा शेवटचा अंक लख्खपणे दिसू लागतो.

सर्वांवर प्रेम उधळत जा…

स्वत:कडे दुर्लक्ष करू नका…स्वत:च स्वत:चा आदर ठेवा. इतरांनाही आदराने व प्रेमानं वागवा.




Life Style is not a competition!!!

*A very Nice message*

*You were born in a first class hospital, I was delivered at home, we both survived.*

*You went to a private primary school and I went to a public school, we both ended in the same high school.*

*You woke up from the bed and I woke from the floor, we both had a peaceful night rest.*

*Your outfits are all expensive, mine are all simple and cheap, we both still cover our nakedness.*

*You ate fried rice and roasted chicken, I ate local made food but we both still ate to our satisfaction.*

*You ride on Lexus jeep, Range Rover, G Wagon, Hummer Jeep and I use public transport but we still got to our various destination.*

*You may be reading this post from your Sony xperia, BB Z10, Q10, Samsung Galaxy 6edge, IPhone6+ and I typed it with my Touch one broken screen, we still see the message.*

*Lifestyle is not a competition and there are different ways to get a lot of things done, different lanes all leading to the same destination. Just because your neighbor is doing things faster does not mean you are failing.*

*Happiness doesn’t come from having everything, but making the best out of what you have, it’s all about how you see yourself.*

*Happiness is not having what you like. Happiness is liking what you have and being content…*
*Courtesy says*
*You must never ask a woman her age and a man his salary.*
*Do you know why, Have you ever thought about it..*
*Well here is a beautiful insight…*
*It is wrong to ask a woman her age because she hardly ever lives for herself!*
*And it is wrong to ask a man his salary because he hardly ever spends on himself!.*

Know your Strengths

एका ऑफिसमध्ये लेडीज रिसेप्शनिस्टची जागा भरायची असते. पेपरला जाहिरात देण्यात येते. कंपनी नामांकित असल्याने अर्जही खूप येतात. ठरलेल्या दिवशी मुलाखती सुरू होतात. बॉस स्वतःच मुलाखत घेत असतो. एकीची मुलाखत चालू असतानाच टेबलावरचा फोन वाजतो. डिस्टर्ब् झाल्याने बॉस त्रासून फोन उचलतो. मात्र तिकडून अतिशय गोड आवाज येतो.
“नमस्कार सर, मी स्वरदा बोलतेय.”
फोनवरचा तो गोड आणि मंजुळ आवाज ऐकून बॉसचा वैताग कमी होतो.
बॉस : “बोला”
“काही नाही. तुमच्या ऑफिसमधील रिसेप्शनिस्टच्या जागेसाठी मलाही यायचंय.”
बॉस : “मग प्रॉब्लेम काय आहे ? इथे मुलाखती सुरू आहेत. तुम्हीही येऊ शकता”
“तेच तर न सर, मलाही यायचंय पण ट्रॅफिक जाममध्ये अडकली आहे. पोचायला उशीर होतोय:”
बॉस : “ओके ओके, या तुम्ही”
***
इकडे मुलाखत सुरू राहते. अजून एकदोन मुलाखती होतात . पण बॉसच्या कानात त्या स्वरदाचा आवाज गुंजत असतो.
दहा पंधरा मिनिटांनी पुन्हा फोन येतो.
“सर, ट्रॅफिक कमी झालेय मी निघाली आहे. पण प्लिज सर उशीर झाला तर समजून घ्या”
बॉस : “हरकत नाही. या तुम्ही, पण शक्यतो वेळेत या”
***
पुन्हा तो आवाज ऐकून बॉस विचार करू लागतो. खरेच किती सौजन्यशील मुलगी आहे. फोनवरचा आवाज ऐकताना आपण मंत्रमुगध होतोय. हीच मुलगी परफेक्ट आहे रिसेप्शनिस्ट म्हणून !!
तरी इकडे अजून शिल्लक उमेदवाराच्या मुलाखती सुरूच असतात. पण बॉस आता या मुलाखती औपचारिकपणे घेत असतो. कारण त्याच्यासाठी “स्वरदा” फिक्स झालेली असते. इतक्यात अर्ध्या तासाने पुन्हा फोन येतो.
“सर, मी तुमच्या ऑफिसच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये आहे. पण गाडी लावायला जागा नाहीये. मी बाहेर रस्त्यावर कुठे जागा मिळतेय का पाहून येतेय. सर प्लिज, त्यामुळे थोडा उशीर होतोय. प्लिज प्लिज”
बॉस : “हरकत नाही. या तुम्ही सावकाश”
***
आता बॉसला तिला भेटायची, पाहायची उत्सुकता लागून राहते. इतक्या मंजुळ आवाजाची मुलगी, नक्की कशी असेल ? म्यानर्स तर चांगले आहेत. नक्की हिलाच घेऊया.
***
अजून सात आठ उमेदवार शिल्लक असतानाच एक चिट्ठी घेऊन शिपाई केबिनमध्ये येतो. चिट्ठीवर लिहिलेले असते.
“सर, मी स्वरदा, आलेय तुमच्या ऑफिसमध्ये”
बॉस बाकी उमेदवाराची लिस्ट बाजूला ठेवूंन तिला लगेच आत बोलावतो.
स्वरदा आत येते. आणि sssssss
बॉस एकदम दचकतो. दारात एक सावळी (जवळपास डार्कच कलरची, थोडीशी ग्रामीण ढंग वाटावा अशी “स्वरदा” उभी असते. बॉसचा भ्रम निरास होतो. त्याच्या अपेक्षेत तिची प्रतिमा जरा वेगळीच (आणि सुंदर वगैरे) असते.
स्वरदा बोलू लागते.
“सर, मला माहीत आहे. तुम्ही मला पाहून निराश झाला असणार. तुमच्या अपेक्षे प्रमाणे मी दिसायला सुंदर नाही. ते मलाही माहीत आहे. पण सर, मी इथे येण्याआधी तुमच्या कंपनीची माहिती काढलीय. त्यानुसार इथे बाहेरून येणारे ग्राहक कोणीच नसतात. आपली सर्व कामे फोनवर चालतात. आणि सर फोनवर आवाज लागतो, सौंदर्य नाही. हे तुम्हालादेखील माहीत आहे. आणि अजून एक सर, केवळ सौंदर्य नाही म्हणून आजवर अनेक ठिकाणाचा नकार पचवलाय. यावेळी म्हणून मी थोडा वेगळा विचार केला. आणि ठरवून तुमच्याशी मुद्दाम आधीच तीनचार वेळा फोनवर बोलत राहिले. माझे जे मेन qualification आहे तो आवाज तुम्ही ऐकला. म्हणून तर बाकी उमेदवाराला बाजूला ठेवून तुम्ही आधी मला आत बोलावलेय. आता निर्णय तुम्ही घ्यायचाय सर”
****
दोन मिनिट निशब्द शांतता.
बॉस : “ते ठीक आहे. पण तरी इथे इतर स्टाफ वेगळ्या स्टाईलमध्ये राहणारा आहे. त्यांना तू आणि तुलाही ते ऑकवर्ड होईल. त्याचे काय ?”
स्वरदा : “मनासारखी अप्सरा तर कुणालाच मिळालेली नसते. तुमचे लग्न झाले असणारच. विचार करून पहा सर,. तुमच्या १००% अपेक्षेसारखी पत्नी आहे का ? पण तरी तुम्ही सुखी होताच न. कारण सहवासाने समोरच्यामधील एखादे वैगुण्य नंतर ते वैगुण्य वाटत नाही सर. तसेच इथल्याचे होईल”
***
तात्काळ बॉसने ड्रॉवरमधून अपॉईंटमेन्ट लेटर काढले, त्यावर सही केली आणि म्हणाला,
“उद्या सकाळी तू रिसेप्शन टेबलवर मला दिसली पाहिजेस. गुड लक”
**********
डीडी क्लास : आपल्यात उणीव आहे, किंवा आपण कशात तरी कमी आहोत, म्हणून निराश होण्याचे कारण नाही. दुसरा असा एकतरी गुण नक्की असेल जो तुम्हाला विजयी करेल. यशस्वी करेल. त्या “एका” गुणांचा शोध घ्या. नक्की सुखी व्हाल”

डाएट, पणं मनाचं – एका टेस्टी आयुष्याकरता!!!

परवा एका जुन्या मित्राला भेटायचा योग आला,
साहाजिकचं प्लॅन ठरला डीनर चा;
हाॅटेलला गेल्यावर ह्या भाउंची नाटक सुरु झाली नां, हे नको ते नको
“सध्या डाएटिंग वर आहे” वगैरे वगैरे.
“जगात एवढ्या भारी गोष्टी लोकांनी बनवल्यातं पणं हे आमचं येडं उकडलेल्या भाजा खात होतं हाॅटेलातं”,
अरेरे !!!
दोन चांगल्या शिव्या हासडुन मग मी अचानक त्याला म्हणलं,
“अरे राजा असंच कधितरी मानसिक डाएट करतं जा” !
पण त्याचा अर्थ न कळल्यामुळे त्यानी एक वाईट लुक दिला
आणि मी पण तो विषय तात्पुरता सोडुन दिला,
पण घरी आल्यावर माझं मन अजुन सुदधा गुगलसर्च करतं होतं.
पण हल्ली सहजं काय सुचेलं सांगता नाही आणि आज ह्या विषयावरं वाटलं लिहावासं.
*मानसिक डाएट*
ही कन्सेप्ट जरा नविन आहे,
पण ती तुम्ही समजुनं घ्याल ही खात्री सुदधा आहे.

म्हणजे बघाना
आपलं वजन वाढतं,
आयुष्याच्या फिगरवर परिणाम होतो,
बीपीच्या गोळ्या सुरु होतात,
शुगर डिटेक्ट होते
किंवा कधी कधी स्वत:ची आगाऊ काळजी म्हणुन सुद्धा
किंवा कधी कधी तर चक्क फॅशन म्हणुन
आपण डाएट करायचा प्रयत्न करतो.
हे सगळ करतं असताना आपण आपल्या मानसिक आरोग्या कडे पुर्णपणे दुर्लक्ष करतो.
मी कुठेतरी वाचलं होतं की
*”तुमच्या मनातल्या विचारांचा प्रचंड प्रभाव तुमच्या शरीरावर असतो”*
ते वाक्य मनाला प्रचंड भिडलं
त्या वेळी मग खरंच विचार केला
की आपल्या मनाला सुद्धा डाएटिंग ची तेवढीचं गरज आहे का
जेवढी शरीराला आहे?
अफसोस !
असे बोर्ड्स अजुन दिसले नसतील ना मार्केटमधे;
*”इथे मानसिक डाएट प्लॅन करून मिळतील”*.
अवघंड आहे असं होणं,
मानसिक डाएट म्हणजे *काउंसिलींग नव्हे*.
मी बोलतोय ते एका टेस्टी आयुष्याची चव घेण्याकरता केलेल्या डाएट बद्दल !
हल्ली सगळ्यांना सगळं कसं टेस्टी लागतं
स्वत:च तोंड कडु का असेना,
पण लाईफ मधे स्पाईस महत्वाचा आहे बाॅस !
स्वत:च अवघं आयुष्य बदलुन टाकायची ताकद आपल्या विचारांमधे असते
मग त्यांना चांगलं हेल्दी ठेवायची जबाबदारी आपलीचं असते.
तर *मानसिक डाएट* म्हणजे काय करायचं
तरं आपले विचार आधिकाधीक फिल्टर्ड कसे रहातील
ह्याचा प्रयत्न करायचा,
तेलकट-तुपकट म्हणजे फडतुस-निगेटिव्ह विचार आपण करणार नाही,
अती-गोड म्हणजेच स्वत:च्या आनंदात दुसर्याला विसरुन जाणारे विचार*
आपण जवळ येऊ देणार नाही.
दररोज एका व्यक्तिला तरी आपण एक छान स्माईल देऊन खुष करु,
दुसर्‍यांच्या पर्सनल आयुष्यात डोकावुन मजा घ्यायला लावणारे
कुचके-नासके विचार फेकुन देऊ,
आठवड्यातुन एकदा तरी साध्या विचारांची खिचडी-कढी खाऊ
या अशा मुल्यशिक्षणा बरोबरंच महत्वाचं आहे ते स्वातंत्र्य आणि स्वैराचार
यातला फरकं ओळखुन स्वत:ला “रीझनेबल” बनवणं,
दुसर्‍यांच्या मतांना आदर देणं,
दुसर्‍यांना वेळ देणं,
*संवाद चालु ठेवणं*,
मनाचं वातावरण नेहमी *हलकं फुलकं* ठेवणं,
एकमेकांच्या अस्तित्वाची *जाणिव ठेवणं*
आणि बरंचकाही.
या सगळ्यातला *समतोल* हरवला ना
की आपल्या नात्यांना *अपंगत्व* येणारंच
आणि मग नीट डायग्नोसीसंच झालं नाही
म्हणुन मनाला कायमची *बेडरेस्ट* पण मिळु शकते.
माणुस आहे,
मनं पण *थकतं* हो कधीकधी,
त्याला *इंस्टंट एनर्जी* मिळते ती फक्त एक कप *काॅन्फिडन्सच्या चहाने*,
*वाह ताज !!!*

सगळ्यात महत्वाचं
कि आपल्या डाएट चे *साईड इफेक्ट्स* खुप मस्त असतातं.
लोकं *प्रेमात पण पडु शकतात* तुमच्या.
तुमच्या चेहर्‍या वरचा ताण कमी होतो,
तुम्ही यंग वाटू लागता, टेंन्शन कमी होतात, लाईफ पाॅपकाॅर्न इतकंच हलकं होतं.
वास्तविक, मन ओके असेल
तरचं लाईफ ओके असतं, नाही कां?

असं ह्या डाएट चं व्रत
हे आजच्या सॅन्डव्हिच जीवनशैली मधे एक संजीवनी देईल हे नक्की.
साध्या आणि ताज्या विचारांच *सॅलड* आपली नक्की काळजी घेईल.
शाकाहारी विचार लंबी ऊम्र देऊन जातील.
बदल हा नेहमीच चांगला असतो.
असा मानसिक डाएट एकदा करुन बघायला काय हरकतं आहे ना ?
कारण *गुगलवर “एव्हरेस्ट” बघण्यापेक्षा प्रत्यक्षात बघण्यातं जास्त मजा आहे
आणि त्या एव्हरेस्टवर जायला आपलं *मनंच* खरी ताकद देणार आहे.
चला तर मगं भेटु लवकरंच *एव्हरेस्ट वर*!!!

Some Heath tips for long life

१०० वर्षे निरोगी जगण्याचा मंत्र हे सर्व पाळल्यास आजारपणापासुन दूर राहु आणि सतत तरुण व निरोगी राहण्याचा अनुभव घेवु

प्रामुख्याने शरीरात तिन प्रकारचे दोष असतात
१) वात २) पित्त ३) कफ
वरील दोष समप्रमाणात ठेवणे यालाच आयुर्वेद म्हणतात .यामध्ये बिघाड झाला की आपल्याला त्या दोषाचा आजार होतो. यावर उपाय म्हणजे आपली जीवनशैली थोड़ी बदलली की आपल्याला त्याचे चांगले परिणाम अनुभवायला मिळतात
आपण नुसते बोलतो की जुने लोक जास्त वर्ष जग़ायचे पण आपण हे कधी पाहिले नाही की ते लोक एवढे वर्ष तंदुरुस्त कसे जगायचे ?

*त्यासाठी हे वाचुन कृतीत आणा,
———————————————-
१) सकाळी लवकर उठावे म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर ४.३० ते ५.०० यावेळेत उठावे.
२) दात घासण्याआधी कोमट पाणी हळुवारपणे प्यावे म्हणजे तोंडातील सर्व लाळ पोटात जावी याप्रमाणे १- ३ ग्लास पाणी खाली बसुनच प्यावे. (अनेक रोग दूर होतात)
३) पाणी पिल्यावर पोटावर दाब पडतो आणि प्रातः विधि करुन घ्यावा.
४) त्यानंतर दात घासावे त्यामध्ये कडु निंबाची काडी,आंब्याची काड़ी, करंजेची काड़ी, बाभळीची काड़ी ई. किंवा कोणतेही स्वदेशी दंतमंजन किवा पेस्ट वापरु शकता. (पंचगव्य दंतमंजन)
दंत रोग दूर राहतात
५) नंतर अंघोळ करावी शक्यतो थंड पाणी किंवा कोमट पाणी वापरावे. अंघोळ करताना गरम पानी कधीच वापरु नये.
६) सकाळी ७.३० ते ९.३० च्या दरम्यान जठराग्नि सर्वात तेज असतो त्यावेळी पोट भरून जेवण करावे. जमीनीवर मांडी घालून बसुन शांतचित्ताने जेवणे आदर्श. (अन्न पचन उत्तम होते)
जेवण नेहमी सूर्याच्या उपस्थितीतच करावे.
७) जेवणाच्या अगोदर ४५मिनीट आणि जेवणानंतर १ तासाने पाणी प्यावे.जेवताना एक ते दोन घोट पाणी प्यायला हरकत नाही.
८) सकाळी फळांचा ज्युस प्या, दुपारी दही ताक किंवा मठ्ठा प्या, आणि झोपताना देशी गाईचे दूध देशी गाईचे तुप व हळद टाकुन प्या.
९) नेहमी पाणी पिताना हळुवार व खाली बसूनच घोट घोट पाणी प्यावे उभे राहून, गड़बडीने पाणी पिवु नये.
(शरीराला दररोज लाळेची गरज असते जेवताना थोड़ी लाळ पोटात जाते आणि बाकीची लाळ आपल्याला पाण्यातुनच शरीरात घालवावी लागते त्यासाठी पाणी घोट घोट करूनच प्या तसे केल्यास बरेच आजार दूर राहतात )
१०) नेहमी जेवण केल्यावर १० ते १५ मिनिट वज्रासनात बसावे. दुपारी जेवण केले की वामकुक्षी (२० मिनीट झोपावे) घ्यावी. आणि संध्याकाळी जेवण केल्यावर ३तास झोपु नये व शतपावली करावी.
११) अॅल्युमिनियमच्या भांड्यातील भोजन तसेच पाणी कधीच पिवु नये व काहीही खावु नये. अॅल्युमिनियम मधे बनवलेले जेवण करणे म्हणजे विष प्राशन करणे होय .
१२) भोजन करतांना नेहमी मातीच्या भांड्यांचा वापर करावा त्याबरोबर तांब्या,पितळाची भांडी पण वापरु शकतो.थोडक्यात ज्याचा वितळबिन्दु जास्त आहे अशीच भांडी वापरा.
१३) झोपताना नेहमी आकाशाकडे डोळे असावे असेच झोपावे आणि जमिनीशी जेवढा संपर्क तेवढे चांगले
१४) मैदा,डालडा,वनस्पती तेल, पामतेल, बेकरीचे पदार्थ अजिबातच खावु नयेत.
फिल्टर तेलच वापरा (रिफाईंड तेल विष आहे)
१५) सेंन्द्रिय गुळाचा वापर करावा (साखरेत गंधक असल्यामुळे विष आहे)
१६) पचन लवकर होण्यासाठी जेवणानंतर थोडासा गुळ खावा.
१७) जेवण बनवण्यासाठी फक्त सेंधा मीठ वापरा. (समुद्री मीठ वैद्यकीय सल्लानेच घ्यावे)
१८) कमीत कमी ६ ते ७ तास झोप आरोग्यासाठी पुरेशी आहे.
१९) दररोज एक तास प्राणायाम, १५ मिनीट योगासने, व जेवढे जमेल तेवढे सूर्यनमस्कार करणे.
२०) प्राणायाम मात्र नियमित करणेच
२१) रोज न चुकता एक आवळा किंवा आवळ्याचा रस प्यावा तसेच दुधी भोपळा, गाजर, बिट, मुळा, काकड़ी,कोबी यांचा वापर करावा
२२) जास्त वेळ पाय सोडून बसणे टाळावे, जास्त वेळ उभे राहणे, जास्त वेळ ड्रायव्हिंग करणे टाळावे. त्यापेक्षा जास्त वेळ मांडी घालून बसावे,उकड़ु बसावे, ज्यामुळे आपले मणके व सांधे चांगले राहतील
२३) भारतीय रस म्हणजे उसाचा रस,कोकम सरबत,आवळा रस, लिंबु सरबत, फळांचा ज्युस हेच आपल्या शरीराला उत्तम पोषक आहेत.
२४) भारतीय पोशाख घाला व तो सैल असावा, जास्त फिट टाईट नसावा. व शक्यतो पांढराच असावा.
२५) शरीराचे हे वेग आले की त्यांना रोखु नये. जर रोखले तर शरीरामध्ये ८४ प्रकारच्या व्याधि निर्माण होतात.
लघवीला आली की थांबवु नये, बसुनच लघवी करावी, अश्रु बाहेर येवु द्यावेत, वीर्याला थांबवु नये. रडायला आले तर ऱडावेच, हसायला आले की भरपुर हसावे, जांभई आली की द्यावीच, शिंक आली की बिनधास्त द्यावी ,अपानवायु आला की तसाच बाहेर येऊ द्यावा, संडास आली की थांबवु नये,
२६) कफ कधीच गिळु नये.

देवाशी संवाद ……..फरक फक्त विचारांचा

माणूस : देवा रागावणार नसशील तर एक प्रश्न विचारु का?
देव : विचार ना.
माणूस : देवा, माझा आजचा दिवस तू एकदम खराब केलास. असं का केलंस तू देवा?
देव : अरे काय झालं पण ?
माणूस : सकाळी अलार्म वाजलाच नाही . मला उठायला खूप उशीर झाला .
देव : बरं मग ?
माणूस : मग माझी स्कूटर पण चालू होत नव्हती . कशीबशी रिक्षा मिळाली .
देव : मग?
माणूस : आज कँटीन पण बंद . बाहेर सँडविच खाल्लं . ते पण बेकार होतं .
देव : (नुसताच हसला )
माणूस : मला एक महत्त्वाचा फोन आला होता . त्या माणसाशी बोलताना माझा फोनच बंद पडला .
देव : बरं मग
माणूस : संध्याकाळी घरी गेलो तर लाईट गेली होती.मी इतका थकलो होतो की ए .सी. लावून झोपणार होतो .
का तू असं केलंस देवा माझ्या बरोबर ?

देव : आता नीट ऐक .
आज तुझा मृत्यूयोग होता. मी माझ्या देवदूतांना पाठवून तो थांबवला. त्या गडबडीत अलार्म पण थांबला .
तुझी स्कूटर मी सुरू होऊ दिली नाही कारण स्कूटरला अपघात होणार होता .
कँटीनच्या जेवणातून तुला विषबाधा होणार होती. ते सँडविच वर निभावलं.
तुझा फोन मी बंद पाडला कारण समोरचा माणूस तुला एका कारस्थानात अडकवणार होता.
संध्याकाळी तुझ्या घरी शॉर्टसर्किट होऊन आग लागणार होती म्हणून मी लाईट घालवली .
माणूस : देवा मला क्षमा कर .
देव : क्षमा मागू नकोस. फक्त विश्वास ठेव. माझ्या योजनांविषयी कधीच शंका घेऊ नकोस .

आपल्या आयुष्यात जे बरं वाईट घडतं त्याचा अर्थ फार उशीरा लागतो आपल्याला
आपण खरंच देवावर श्रद्धा आहे असं म्हणतो. मग प्रार्थनेच्या वेळी डुलक्या का येतात ? तीन तासाच्या पिक्चर मध्ये जराही झोप येत नाही. …
आपल्या आयुष्याला सुंदर बनवणारे विचार आपण दुर्लक्षित करतो आणि नको ते मेसेज फॉरवर्ड करतो…..
देवाशीच संगत केली तर आपल्याला एकटं का वाटावं? तोच तर हलवतो सगळी सूत्र…..

माणूस हा सवडीनुसार ,वागत असतो…!
चहात माशी पडली तर चहा फेकून देतो,
पण साजूक तूपात माशी पडली तर तो
माशी फेकून देतो तूप नाही..
अगदी तसच…

आवडत्या माणसाने चूक केली तर
काहीही न बोलता ती पोटात घालतो पण
जर नावडत्याने केली तर आकांडतांडव
करून बोभाटा करतो.

‘माझं’ म्हणून नाही “आपलं” म्हणून जगता आलं पाहिजे …
जग खुप ‘चांगलं’ आहे फक्त चांगलं “वागता” आलं पाहिजे …
सगळं विकत घेता येतं पण संस्कार नाही।
कितीही केल तरी वाळवंटात आणि समुद्रात पिक घेता येत नाही

देह सर्वांचा सारखाच।
फरक फक्त विचारांचा।

*बासरी*

खुप सुंदर आहे अवश्य वाचाच..
*बासरी* …

बासरी तयार करण्यासाठी लागणारा बांबू हा तिथी पाहून तोडतात.

पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी या तिथींना बांबू तोडला तर त्याला हमखास कीड लागते, असं बासरी तयार करणारे सांगतात.

त्याचं कारण म्हणजे या तिथींमध्ये शेवटी ‘मी’ येतो. याच ‘मी’पणाच्या अहंकारातून कार्यनाश होतो आणि बासरी टिकत नाही, असा समज आहे.

कृष्णाचं आवडतं वाद्य बासरी. एकदा कृष्णाच्या सगळ्या सख्या, गोपी बासरीवर चिडल्या आणि म्हणाल्या,आम्ही त्या कृष्णाची एवढी स्तुती करतो, त्याच्या आजूबाजूला वावरतो,पण तो आम्हाला साधा भावही देत नाही.

तू तर एवढी साधी; ना रूप ना काही.पण तो तुला सतत ओठांशी धरून असतो.

तू अशी काय जादू केली आहेस त्याच्यावर? बासरी हसली आणि म्हणाली, ‘तुम्ही माझ्यासारख्या व्हा,मग कृष्ण तुम्हालाही जवळ घेईल.’

अर्थ न कळून गोपींनी बासरीकडे पाहिलं. बासरी पुढे म्हणाली, ‘मी अगदी सरळ आहे; ना एखादी गाठ, ना एखादं वळण. मी पोकळ आहे. त्या पोकळीतून माझ्यातला अहंकार गळून पडलाय.

माझ्या अंगावरच्या सहा छिंद्रातून काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे रिपू मी काढून टाकले आहेत.

मला स्वत:चा आवाजही नाही. माझ्या सख्यानं फुंकर मारली तरच मी बोलते.

तो जशी फुंकर मारतो तशी मी बोलते.’ गोपी निरुत्तर झाल्यl.

अहंकारहित शरीर ही *श्रीहरीची बासरी