माना कि थोडी sayco होती है




माना कि थोडी sayco होती है ।
लेकिन bayco तो bayco होती है ।

बायको म्हणजे कोण असते ?
बायको म्हणजे बायकोच असते .
कधी ती पायात लुडबुडणारी
मांजर असते ,

कधी ती लाडिक चाळे करणारी प्रेयसी असते , कधी ती अटीतटीने भांडणारी विरुध्द पार्टी असते .

कधी ती समजून घेणारी मित्र असते,
कधी त्रास देणारी डोकेदुखी असते ,
कधी मस्का लावणारी असते .

कधी ती जवळ असावी असे वाटतांना गैरहजर असते.

कधी न सांगता समजून घेते,
तर कधी गैरसमज करून घेते,
कधी मूलांची काळजी करते,
कधी स्वतःच्या रुपाची तारीफ करते,
कधी नव-याला नावं ठेवते,
कधी नव-याचा पगार वाढवुन सांगते.

कधी फिरायला नेल्यावर नखरे करते,
कधी हट्टाने हौस पुरवून घेते,
कधी हौसेने नवीन पदार्थ
करून खाऊ घालते.
….
कधी शॉपिंगने बेजार करते,
कधी नव-यासाठी कौतुकाने
काहीतरी खरेदी करते,
कधी कोणाची गुपितं सांगते ,
कधी कोणाला कळु न देता
गुपचूप कारभार उरकते.

कधी तंबी देऊन घराबाहेर सोडते,
कधी घरी यायची वाट बघत बसते.

कधी सरळ सुत असते ,
तर कधी संशयाचे भूत असते ,
कधी नव-याला लगाम घालु पाहते,
कधी नव-यावर प्रेमाचा वर्षाव करते.
कधी शेळी तर कधी वाघ असते, कधी आंबट तर कधी गोड असते .

कधी न म्हणते—की आज
मी दमले, दोन पेग मारते,
कधी न संपणारी घराची ऊर्जा असते
कितीही भांडली तरी
मुकाटयाने जेवायला घालते.
बायको कशीही असली तरी वरच्याने बरोबर शोधून best match
म्हणून आपल्याशीच जोडी
लावून दिलेली असते .

म्हणूनच सांगतो मित्राहो—
नल-दमयंती, रोमिओ-ज्युलिएट, लैला-मजनु आणि आर्ची-परश्या विसरून जा, आणि आपआपल्या बायकांना जीव लावा, काय करायचे तेवढे प्रेम बायकोवरच करा.

माना कि थोडी sayco होती है ।
लेकिन bayco तो bayco होती है ।

बायकाे नावाचं तुफान मोठं विचित्र असतं मित्रा, ते नवरा नावाच्या
इकडेतिकडे भिरभिरणा-या
फुलपाखराला एकाच
फुलामध्ये गुंतवून ठेवत.

आपण आजारी पडलो तर या तुफानाला झोप लागत नाही.
आपण बाहेरगावी जातो तेव्हा हे तुफान देहाने तर घरात असतं
पण मनानं ते आपल्याभोवती फिरत असतं.

आपण उदास असतो नां तेव्हा त्याच्या ओठावर हसु फुलत नाही आपण आनंदात असताना
या तुफानाचं दु:ख चेह-यावर येत नाही.

थोडक्यात काय तर या तुफानमुळेच
आयुष्यात चैतन्य आहे.
बाहेरच्या तारांकीत जगात
कितीही फिरलो तरी संध्याकाळी घरी जाण्याची ओढ लागते नां
त्याचं कारण हे तुफानच आहे.

साठीनंतरच्या वयात या
तुफानाचं खरं महत्व समजतं.
सगळं गणगोत विरोधात गेलं
तरी हे तुफान आपला हात सोडत नाही. आपल्या पोटात घास जाताे
तेव्हा या तुफानाला ढेकर येतो.
उतरत्या वयात आपल्याला जगायचं कारण फक्त आणि फक्त एकच असतं ते म्हणजे हेच ‘तुफान’…!
पाहीजे दोस्ता पाहीजे प्रत्येकाच्या आयुष्यात एक तुफान पाहीजे.




आपल्यातलं थोडसं सुख दुसऱ्याला देणे हेच खरं जीवन – Best What’s app message





विश्वास नांगरे-पाटील यांच्या पुस्तकातील एक अनुभव….

रेल्वे स्टेशनच्या जवळ सायकल लावण्यासाठी जागा होती. 30 रुपये महिन्याला द्यावे लागायचे.
तिथे सायकलींवर लक्ष ठेवण्यासाठी एक म्हातारी बाई बसलेली असायची. चार बांबू लावून वर कडबा आणि ताडपत्री लावून तयार केलेलं छत होत. त्यातच ती आजी राहायची. अंगावर एकदम जुनी फाटकी साडी…ती पण मळलेली. डोक्यावरचे केसपूर्ण पिकलेले होते. साधारण 70-75 वय असावे. तिथे एक जूनं गोणपाट होतं. त्यावरच बसलेली असायची.
थंडी पासून बचावासाठी एक काळी चादर पण होती. थंडीच्या दिवसात कायम अंगावर घेतलेली ती दिसायची. समोर एक जर्मनचे ताट आणि एक स्टीलची चेपलेली वाटी. एवढंच.
एवढं असूनही चेह-यावर कायम स्मितहास्य असायचं.
एक दिवस संध्याकाळी घरी जाताना मी सायकल काढत होतो तेव्हा तिने मला विचारलं, “बाळ, नाव काय तुझं…?”
मी नाव बोललो
कदाचित त्यांना ऐकू नाही गेलं किंवा नाव समजलं नाही. त्यांनी पुन्हा विचारलं. काय?
मी पुन्हा बोललो
त्या हसत हसत बोलल्या “अच्छा . छान आहे नाव”
त्यांनी मग इतर चौकशी केली. म्हणजे घरी कोण असतं? गाव कोणतं? नंतर सायकलीला अडकवलेल्या माझ्या बॅग कडे पाहून विचारलं, “डब्या मध्ये काही शिल्लक आहे का?” मी क्षणभर गोंधळलो. मग बोललो, “नाही ओ आजी”. का कुणास ठाऊक खूप वाईट वाटलं, नाही बोलताना. मग पुन्हा तोच हसरा चेहरा करून बोलल्या, “काही हरकत नाही पण कधी काही शिल्लक राहीलं तर टाकून देण्यापेक्षा आणत जा आणि मला देत जा”
हे सांगताना त्यांचा चेहरा जरी हसरा असला तरी त्यांचे डोळे ओशाळलेले वाटत होते. कदाचित त्यांना लाज वाटत होती असं काही मागण्याची पण मजबूरी होती त्यांची. उपाशी पोट कोणाकडूनही काहीही करवून घेतं. मी हो बोललो आणि निघालो.
घरी आल्यानंतर रात्री आईजवळ बसलो आणि त्या आजी बद्दल सांगितलं. तिला पण खूपवाईट वाटलं. दुस-या दिवशी सकाळी तिने न सांगता डब्यात 2 चपाती जास्त भरल्या आणि बोलली त्या आजीला दे. मला खूप बरं वाटलं. मी निघणार तेवढ्यात बाबांचा आवाज आला, “आता गेल्या गेल्या दे म्हणजे आताच ताजं खाऊन घेतील”
मी हो बोलून निघालो. त्या आजी झोपल्या होत्या. त्यांना उठवून चपाती आणि भाजी त्यांच्या ताटात काढून दिलं. त्या आजींच्या चेह-यावर वेगळाच आनंदं होता. त्यांच्या चेह-यावरील आनंदं पाहून मनाला खूप समाधान मिळालं.
दुपारी ऑफिस मध्ये जेवताना अचानक त्या आजीची आठवण आली आणि एक चपाती काढून ठेवली आणि मित्रांच्या पण डब्यात जे जेवण शिल्लक होतं ते माझ्या डब्यात भरून घेतलं.
संध्याकाळी मी तो डबा आजींना दिला. मग त्या गोड हसल्या. त्यांनी डबा रिकामा करून दिला आणि त्यातील अर्धी चपाती काढली त्याचे छोटे छोटे तुकडे केले आणि थोडं दूर जावून पसरून ठेवले आणि त्यांच्या जवळच्या वाटीत पाणी भरून त्या तुकड्याजवळ ठेवलं.
मी त्यांची प्रत्येक हालचाल पाहत होतो. त्या पुन्हा जवळ येऊन बसल्या. मी विचारलं, “आजी काय करताय हे ?”
त्या हसल्या आणि बोलल्या…बघ तिकडे. मी तिकडे पाहिलं तर काही चिमण्या आल्या आणि ते तुकडे खाऊ लागल्या आणि जवळच्या वाटीतील पाणी पिऊ लागल्या. मधेच एका चिमणीने एक तुकडा उचलला आणि उडून गेली.
कदाचित ती तो तुकडा आणखी एखाद्या भुकेल्या पिल्लासाठी घेऊन चालली होती.
त्यादिवशी जीवनाचा एक वेगळाच रंग दिसला. मी माझ्या डब्यातून काही घास त्या आजीला दिले होते आणि त्या आजीने तिच्या घासातील काही घास त्या चिमण्यांना दिलेत आणि त्या चिमण्यांनी पण काही भाग तिच्या पिल्लांसाठी नेला.
कदाचित हेच जीवन होतं. दुस-यासाठी थोडसं सुख घेवून जाणे.
जवळ जवळ एक वर्ष असच चालू राहीलं. नंतर माझं शिक्षण पूर्ण करून पुण्यात आलो जॉब साठी. चांगला जॉब मिळाला तेव्हा आवर्जून त्या आजींना पेढे देण्यासाठी गेलो. त्यांनी पेढा घेतला. अर्धा मला भरवला आणि डोळ्यात पाणी आणून बोलल्या “आठवणीने मला पेढा दिलास यातच समाधान आहे. माझ्या पोटच्या पोराने मला महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी आणलं आणि मला इथेच सोडून चुकवून निघून गेला. पण कोण कुठला तू… मला प्रेमाने पेढा दिलास खूप समाधान वाटलं. खूप मोठा हो….साहेब होशील मोठा तू ”
मी त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला आणि निघालो. तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की, या जगात आशिर्वाद आणि आनंदं मिळवण खूप सोपं आहे. म्हणजे एखाद्याला आपण आनंद दिला की, त्या बदल्यात आपल्याला समाधान, आनंद आणि आशिर्वाद मिळून जातात.
पण आयुष्य संपलं तरी आपण हे दुसरीकडे शोधत बसतो.
मध्ये वर्ष निघून गेलं. जॉब आता पर्मनंट झाला होता. म्हणून पेढा देण्यासाठी मी गेलो पण त्या तिथे नव्हत्या. त्यांचं साहित्य पण नव्हतं तिथे. फक्त दूर नेहमीच्या जागेवर ती वाटी होती.
मी जवळच्या टपरीवर गेलो
आणि विचारलं, “इथल्या आजी कुठे आहेत ?” त्याने मला पाहिलं आणि बोलला, “अरे वारल्या त्या. 2 महीने होवून गेले. ऐकून खूप वाईट वाटलं. मन सुन्न झालं. जणू कोणीतरी जवळचं गेलं होतं.
मी त्या वाटीकडे पाहिलं. कोरडी पडली होती. मी माझ्या जवळची पाण्याची बाटली काढली आणि ती वाटी पाण्याने भरली आणि त्यांच्या साठी आणलेला पेढा ठेवला तिथेच आणि निघालो तिथून. चालता चालता सहज मागे वळून पहिलं तर एक चिमणी त्या पेढ्यावर चोच मारून खात होती.
अस बोलतात की पिंडाला कावळा शिवला तर समजायचं की त्या व्यक्तिला मुक्ति मिळाली. त्या चिमणीला पाहून वाटलं कदाचित मुक्ति मिळाली त्या आजीला !!!
आपल्यातलं थोडसं सुख दुसऱ्याला देणे हेच खरं जीवन



‘I CAN’ and ‘I CANNOT’ by J. Alchem




Once upon a time,
There were two close friends.
Living as the first sight of humanity.
‘I CAN’ and ‘I CANNOT’ were their names……
‘I CAN’ was positive one,
According to ‘I CAN.’
“Everything was possible.”
I CAN travelled all over the world,
Climbed at the peak of highest mountain,
Gathered several impossible looking achievements,
And became a successful person!
While ‘I CANNOT’ was a negative one.
I CANNOT found impossible in every possible,
Neither had he climbed any Everest,
Nor gathered any achievement!
I CANNOT didn’t become a successful person.
But just sat on chair and thought only one thing- “I cannot”
After few years of friendship,
They fell in love with each other.
Why did they fall in love with each other?
It is a mystery.
Maybe because I CAN and I CANNOT be challenging to change into possible.
Maybe because love happens between odd
Maybe because they were too close to be in love!
Or
Maybe God was having plan for them.
Whatever it was, they were in love and finally got married.
Their generation started growing and today they are having billions of children all over the world.
Most of their children acquired the DNA of both ‘I CAN’ and ‘I CANNOT.’ They carry the mix thinking of their parents ‘I CAN’ and ‘I CANNOT’ and now they are confused whether ‘they can’ or ‘they cannot’
They are called ‘HUMAN BEINGS’




One of the best Whats App message




एकदा एका जंगलात एक हरीणी बाळाला जन्मं देणार असते.

पण ती ज्या ठीकाणी बसलेली असते तिथे जवळच एक वाघ तिच्यावर नजर ठेवून असतो.

एका बाजूला एक शिकारी तिच्यावर बंदूक रोखून उभा असतो. आणि जवळच जंगलात वणवा पेटलेला असतो.

सगळ्या बाजूने दिसणार्या या संकटांपैकी एकतरी संकट तिला गिळून टाकेल याची तिला खात्री असते.

तो शिकारी बंदुकीतून गोळी सोडतो…. वाघ जोरात झेप घेतो… आणि तितक्यात वीज चमकते… त्या शिकार्याचं लक्षं वेधलं जातं… आणि ती गोळी त्या वाघाला लागते…वीज चमकून गडगडाट होतो आणि पाऊस सुरु होतो… त्यामुळे वणवाही विझतो…

आणि

या सगळ्या गोष्टी होत असताना ती हरिणी हळूच एका लहानश्या हरणाला जन्मं देते…

माणसाचं आयुष्य हे असंच असतं…

त्याच्या हातात काहीच नसतं…

आपण फक्तं प्यादी असतो या पटावरची…

कर्ता करविता असतो तो ईश्वर…

एक एक वाटत असताना कुठल्या क्षणी काय होईल काहीच सांगता येत नाही…

मारणाराही तोच असतो आणि तारणाराही तोच…

कर्माचा सिद्धांत हा कीतीही खरा असला तरी शेक्सपिअरचं एक वाक्यं खूप काही सांगून जातं…

‘Behind every misfortune there is a crime… But behind every crime there is a misfortune…!’

आयुष्य हे असंच असतं… कुणाला दोष द्यावा आणि कुणाचं कौतुक करावं… दोन्ही एकाच रथाची चाकं…

कुठलं खड्डयात अडकणार आणि कुठलं वर टांगून राहणार हे ठरवणारा मात्र तोच…

‘समुद्रात बुडून त्याचा म्रुत्यु झाला’…पण त्याच्या मनातून समुद्राकडे तो त्याक्षणी कसा ओढला गेला? कोण सांगेल?

‘चाळीस घरांच्या ढिगार्याखाली गाडलं गेलेलं सहा महीन्यांच बाळ, 30 तासांनंतरही तसच छान हसत खेळत सापडतं’…

त्याला त्या ढिगार्यातही कुशीत घेणारं कोण असतं?

‘नेहमीच्याच रस्त्याने जाणारी एक बस अचानक एक दिवस दरीत कोसळते.’ तिला दरीत ढकलणारं असतं कोण? वारा? की ड्रायव्हर? की ड्रायव्हरच्या डोळ्यासमोर अचानक आलेला अंधार? कोण सांगेल?

एका मुलाच्या रोजच्या नेहमीच्या ट्रेनमधे बाम्बस्फोट होतो… पण तो त्यादिवशी ऑफिसला गेलेलाच नसतो… त्यामुळे तो वाचतो…

ऑफिसला न जाण्याची इच्छा त्याला त्याच दिवशी का होते? कोण सांगेल?

त्या हरिणीच्या बाळाचा जन्मं होताना अचानक वीज का चमकली? कोण सांगेल? कोण सांगेल कोण?? कुणीच नाही…
हे असंच असतं… भक्तीने रुजवलेलं … प्रेमाने सावरलेलं… आसक्तीने बुडवलेलं… कर्माच्या चक्रात अडकलेलं… ईश्वराने लिहीलेलं … आपलं आयुष्यं…!

मोर नाचताना सुद्धा रडतो… आणि.. राजहंस मरताना सुद्धा गातो….

दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही… आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.

यालाच जीवन म्हणतात.

किती दिवसाचे आयुष्य असते? आजचे अस्तित्व उद्या नसते, मग जगावे ते हसून-खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नसते…!!
नशिबाने दिलेल्या पदाचा गैरवापर करू नका…..
कोणाचा अपमान करू नका आणि कोणाला कमीही लेखू नका…..
– तुम्ही खूप शक्तिशाली असाल,
पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे…..
– कोणी कितीही महान झाला असेल,
पण निसर्ग कोणाला कधीच लायकीपेक्षा महान बनण्याचा क्षण देत नाही…….
स्वतःवर कधीही अहंकार करू नकोस……
देवाने तुमच्या-माझ्यासारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं……

-स्वामी विवेकानंद