Know your Strengths

एका ऑफिसमध्ये लेडीज रिसेप्शनिस्टची जागा भरायची असते. पेपरला जाहिरात देण्यात येते. कंपनी नामांकित असल्याने अर्जही खूप येतात. ठरलेल्या दिवशी मुलाखती सुरू होतात. बॉस स्वतःच मुलाखत घेत असतो. एकीची मुलाखत चालू असतानाच टेबलावरचा फोन वाजतो. डिस्टर्ब् झाल्याने बॉस त्रासून फोन उचलतो. मात्र तिकडून अतिशय गोड आवाज येतो.
“नमस्कार सर, मी स्वरदा बोलतेय.”
फोनवरचा तो गोड आणि मंजुळ आवाज ऐकून बॉसचा वैताग कमी होतो.
बॉस : “बोला”
“काही नाही. तुमच्या ऑफिसमधील रिसेप्शनिस्टच्या जागेसाठी मलाही यायचंय.”
बॉस : “मग प्रॉब्लेम काय आहे ? इथे मुलाखती सुरू आहेत. तुम्हीही येऊ शकता”
“तेच तर न सर, मलाही यायचंय पण ट्रॅफिक जाममध्ये अडकली आहे. पोचायला उशीर होतोय:”
बॉस : “ओके ओके, या तुम्ही”
***
इकडे मुलाखत सुरू राहते. अजून एकदोन मुलाखती होतात . पण बॉसच्या कानात त्या स्वरदाचा आवाज गुंजत असतो.
दहा पंधरा मिनिटांनी पुन्हा फोन येतो.
“सर, ट्रॅफिक कमी झालेय मी निघाली आहे. पण प्लिज सर उशीर झाला तर समजून घ्या”
बॉस : “हरकत नाही. या तुम्ही, पण शक्यतो वेळेत या”
***
पुन्हा तो आवाज ऐकून बॉस विचार करू लागतो. खरेच किती सौजन्यशील मुलगी आहे. फोनवरचा आवाज ऐकताना आपण मंत्रमुगध होतोय. हीच मुलगी परफेक्ट आहे रिसेप्शनिस्ट म्हणून !!
तरी इकडे अजून शिल्लक उमेदवाराच्या मुलाखती सुरूच असतात. पण बॉस आता या मुलाखती औपचारिकपणे घेत असतो. कारण त्याच्यासाठी “स्वरदा” फिक्स झालेली असते. इतक्यात अर्ध्या तासाने पुन्हा फोन येतो.
“सर, मी तुमच्या ऑफिसच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये आहे. पण गाडी लावायला जागा नाहीये. मी बाहेर रस्त्यावर कुठे जागा मिळतेय का पाहून येतेय. सर प्लिज, त्यामुळे थोडा उशीर होतोय. प्लिज प्लिज”
बॉस : “हरकत नाही. या तुम्ही सावकाश”
***
आता बॉसला तिला भेटायची, पाहायची उत्सुकता लागून राहते. इतक्या मंजुळ आवाजाची मुलगी, नक्की कशी असेल ? म्यानर्स तर चांगले आहेत. नक्की हिलाच घेऊया.
***
अजून सात आठ उमेदवार शिल्लक असतानाच एक चिट्ठी घेऊन शिपाई केबिनमध्ये येतो. चिट्ठीवर लिहिलेले असते.
“सर, मी स्वरदा, आलेय तुमच्या ऑफिसमध्ये”
बॉस बाकी उमेदवाराची लिस्ट बाजूला ठेवूंन तिला लगेच आत बोलावतो.
स्वरदा आत येते. आणि sssssss
बॉस एकदम दचकतो. दारात एक सावळी (जवळपास डार्कच कलरची, थोडीशी ग्रामीण ढंग वाटावा अशी “स्वरदा” उभी असते. बॉसचा भ्रम निरास होतो. त्याच्या अपेक्षेत तिची प्रतिमा जरा वेगळीच (आणि सुंदर वगैरे) असते.
स्वरदा बोलू लागते.
“सर, मला माहीत आहे. तुम्ही मला पाहून निराश झाला असणार. तुमच्या अपेक्षे प्रमाणे मी दिसायला सुंदर नाही. ते मलाही माहीत आहे. पण सर, मी इथे येण्याआधी तुमच्या कंपनीची माहिती काढलीय. त्यानुसार इथे बाहेरून येणारे ग्राहक कोणीच नसतात. आपली सर्व कामे फोनवर चालतात. आणि सर फोनवर आवाज लागतो, सौंदर्य नाही. हे तुम्हालादेखील माहीत आहे. आणि अजून एक सर, केवळ सौंदर्य नाही म्हणून आजवर अनेक ठिकाणाचा नकार पचवलाय. यावेळी म्हणून मी थोडा वेगळा विचार केला. आणि ठरवून तुमच्याशी मुद्दाम आधीच तीनचार वेळा फोनवर बोलत राहिले. माझे जे मेन qualification आहे तो आवाज तुम्ही ऐकला. म्हणून तर बाकी उमेदवाराला बाजूला ठेवून तुम्ही आधी मला आत बोलावलेय. आता निर्णय तुम्ही घ्यायचाय सर”
****
दोन मिनिट निशब्द शांतता.
बॉस : “ते ठीक आहे. पण तरी इथे इतर स्टाफ वेगळ्या स्टाईलमध्ये राहणारा आहे. त्यांना तू आणि तुलाही ते ऑकवर्ड होईल. त्याचे काय ?”
स्वरदा : “मनासारखी अप्सरा तर कुणालाच मिळालेली नसते. तुमचे लग्न झाले असणारच. विचार करून पहा सर,. तुमच्या १००% अपेक्षेसारखी पत्नी आहे का ? पण तरी तुम्ही सुखी होताच न. कारण सहवासाने समोरच्यामधील एखादे वैगुण्य नंतर ते वैगुण्य वाटत नाही सर. तसेच इथल्याचे होईल”
***
तात्काळ बॉसने ड्रॉवरमधून अपॉईंटमेन्ट लेटर काढले, त्यावर सही केली आणि म्हणाला,
“उद्या सकाळी तू रिसेप्शन टेबलवर मला दिसली पाहिजेस. गुड लक”
**********
डीडी क्लास : आपल्यात उणीव आहे, किंवा आपण कशात तरी कमी आहोत, म्हणून निराश होण्याचे कारण नाही. दुसरा असा एकतरी गुण नक्की असेल जो तुम्हाला विजयी करेल. यशस्वी करेल. त्या “एका” गुणांचा शोध घ्या. नक्की सुखी व्हाल”

डाएट, पणं मनाचं – एका टेस्टी आयुष्याकरता!!!

परवा एका जुन्या मित्राला भेटायचा योग आला,
साहाजिकचं प्लॅन ठरला डीनर चा;
हाॅटेलला गेल्यावर ह्या भाउंची नाटक सुरु झाली नां, हे नको ते नको
“सध्या डाएटिंग वर आहे” वगैरे वगैरे.
“जगात एवढ्या भारी गोष्टी लोकांनी बनवल्यातं पणं हे आमचं येडं उकडलेल्या भाजा खात होतं हाॅटेलातं”,
अरेरे !!!
दोन चांगल्या शिव्या हासडुन मग मी अचानक त्याला म्हणलं,
“अरे राजा असंच कधितरी मानसिक डाएट करतं जा” !
पण त्याचा अर्थ न कळल्यामुळे त्यानी एक वाईट लुक दिला
आणि मी पण तो विषय तात्पुरता सोडुन दिला,
पण घरी आल्यावर माझं मन अजुन सुदधा गुगलसर्च करतं होतं.
पण हल्ली सहजं काय सुचेलं सांगता नाही आणि आज ह्या विषयावरं वाटलं लिहावासं.
*मानसिक डाएट*
ही कन्सेप्ट जरा नविन आहे,
पण ती तुम्ही समजुनं घ्याल ही खात्री सुदधा आहे.

म्हणजे बघाना
आपलं वजन वाढतं,
आयुष्याच्या फिगरवर परिणाम होतो,
बीपीच्या गोळ्या सुरु होतात,
शुगर डिटेक्ट होते
किंवा कधी कधी स्वत:ची आगाऊ काळजी म्हणुन सुद्धा
किंवा कधी कधी तर चक्क फॅशन म्हणुन
आपण डाएट करायचा प्रयत्न करतो.
हे सगळ करतं असताना आपण आपल्या मानसिक आरोग्या कडे पुर्णपणे दुर्लक्ष करतो.
मी कुठेतरी वाचलं होतं की
*”तुमच्या मनातल्या विचारांचा प्रचंड प्रभाव तुमच्या शरीरावर असतो”*
ते वाक्य मनाला प्रचंड भिडलं
त्या वेळी मग खरंच विचार केला
की आपल्या मनाला सुद्धा डाएटिंग ची तेवढीचं गरज आहे का
जेवढी शरीराला आहे?
अफसोस !
असे बोर्ड्स अजुन दिसले नसतील ना मार्केटमधे;
*”इथे मानसिक डाएट प्लॅन करून मिळतील”*.
अवघंड आहे असं होणं,
मानसिक डाएट म्हणजे *काउंसिलींग नव्हे*.
मी बोलतोय ते एका टेस्टी आयुष्याची चव घेण्याकरता केलेल्या डाएट बद्दल !
हल्ली सगळ्यांना सगळं कसं टेस्टी लागतं
स्वत:च तोंड कडु का असेना,
पण लाईफ मधे स्पाईस महत्वाचा आहे बाॅस !
स्वत:च अवघं आयुष्य बदलुन टाकायची ताकद आपल्या विचारांमधे असते
मग त्यांना चांगलं हेल्दी ठेवायची जबाबदारी आपलीचं असते.
तर *मानसिक डाएट* म्हणजे काय करायचं
तरं आपले विचार आधिकाधीक फिल्टर्ड कसे रहातील
ह्याचा प्रयत्न करायचा,
तेलकट-तुपकट म्हणजे फडतुस-निगेटिव्ह विचार आपण करणार नाही,
अती-गोड म्हणजेच स्वत:च्या आनंदात दुसर्याला विसरुन जाणारे विचार*
आपण जवळ येऊ देणार नाही.
दररोज एका व्यक्तिला तरी आपण एक छान स्माईल देऊन खुष करु,
दुसर्‍यांच्या पर्सनल आयुष्यात डोकावुन मजा घ्यायला लावणारे
कुचके-नासके विचार फेकुन देऊ,
आठवड्यातुन एकदा तरी साध्या विचारांची खिचडी-कढी खाऊ
या अशा मुल्यशिक्षणा बरोबरंच महत्वाचं आहे ते स्वातंत्र्य आणि स्वैराचार
यातला फरकं ओळखुन स्वत:ला “रीझनेबल” बनवणं,
दुसर्‍यांच्या मतांना आदर देणं,
दुसर्‍यांना वेळ देणं,
*संवाद चालु ठेवणं*,
मनाचं वातावरण नेहमी *हलकं फुलकं* ठेवणं,
एकमेकांच्या अस्तित्वाची *जाणिव ठेवणं*
आणि बरंचकाही.
या सगळ्यातला *समतोल* हरवला ना
की आपल्या नात्यांना *अपंगत्व* येणारंच
आणि मग नीट डायग्नोसीसंच झालं नाही
म्हणुन मनाला कायमची *बेडरेस्ट* पण मिळु शकते.
माणुस आहे,
मनं पण *थकतं* हो कधीकधी,
त्याला *इंस्टंट एनर्जी* मिळते ती फक्त एक कप *काॅन्फिडन्सच्या चहाने*,
*वाह ताज !!!*

सगळ्यात महत्वाचं
कि आपल्या डाएट चे *साईड इफेक्ट्स* खुप मस्त असतातं.
लोकं *प्रेमात पण पडु शकतात* तुमच्या.
तुमच्या चेहर्‍या वरचा ताण कमी होतो,
तुम्ही यंग वाटू लागता, टेंन्शन कमी होतात, लाईफ पाॅपकाॅर्न इतकंच हलकं होतं.
वास्तविक, मन ओके असेल
तरचं लाईफ ओके असतं, नाही कां?

असं ह्या डाएट चं व्रत
हे आजच्या सॅन्डव्हिच जीवनशैली मधे एक संजीवनी देईल हे नक्की.
साध्या आणि ताज्या विचारांच *सॅलड* आपली नक्की काळजी घेईल.
शाकाहारी विचार लंबी ऊम्र देऊन जातील.
बदल हा नेहमीच चांगला असतो.
असा मानसिक डाएट एकदा करुन बघायला काय हरकतं आहे ना ?
कारण *गुगलवर “एव्हरेस्ट” बघण्यापेक्षा प्रत्यक्षात बघण्यातं जास्त मजा आहे
आणि त्या एव्हरेस्टवर जायला आपलं *मनंच* खरी ताकद देणार आहे.
चला तर मगं भेटु लवकरंच *एव्हरेस्ट वर*!!!

Some Heath tips for long life

१०० वर्षे निरोगी जगण्याचा मंत्र हे सर्व पाळल्यास आजारपणापासुन दूर राहु आणि सतत तरुण व निरोगी राहण्याचा अनुभव घेवु

प्रामुख्याने शरीरात तिन प्रकारचे दोष असतात
१) वात २) पित्त ३) कफ
वरील दोष समप्रमाणात ठेवणे यालाच आयुर्वेद म्हणतात .यामध्ये बिघाड झाला की आपल्याला त्या दोषाचा आजार होतो. यावर उपाय म्हणजे आपली जीवनशैली थोड़ी बदलली की आपल्याला त्याचे चांगले परिणाम अनुभवायला मिळतात
आपण नुसते बोलतो की जुने लोक जास्त वर्ष जग़ायचे पण आपण हे कधी पाहिले नाही की ते लोक एवढे वर्ष तंदुरुस्त कसे जगायचे ?

*त्यासाठी हे वाचुन कृतीत आणा,
———————————————-
१) सकाळी लवकर उठावे म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर ४.३० ते ५.०० यावेळेत उठावे.
२) दात घासण्याआधी कोमट पाणी हळुवारपणे प्यावे म्हणजे तोंडातील सर्व लाळ पोटात जावी याप्रमाणे १- ३ ग्लास पाणी खाली बसुनच प्यावे. (अनेक रोग दूर होतात)
३) पाणी पिल्यावर पोटावर दाब पडतो आणि प्रातः विधि करुन घ्यावा.
४) त्यानंतर दात घासावे त्यामध्ये कडु निंबाची काडी,आंब्याची काड़ी, करंजेची काड़ी, बाभळीची काड़ी ई. किंवा कोणतेही स्वदेशी दंतमंजन किवा पेस्ट वापरु शकता. (पंचगव्य दंतमंजन)
दंत रोग दूर राहतात
५) नंतर अंघोळ करावी शक्यतो थंड पाणी किंवा कोमट पाणी वापरावे. अंघोळ करताना गरम पानी कधीच वापरु नये.
६) सकाळी ७.३० ते ९.३० च्या दरम्यान जठराग्नि सर्वात तेज असतो त्यावेळी पोट भरून जेवण करावे. जमीनीवर मांडी घालून बसुन शांतचित्ताने जेवणे आदर्श. (अन्न पचन उत्तम होते)
जेवण नेहमी सूर्याच्या उपस्थितीतच करावे.
७) जेवणाच्या अगोदर ४५मिनीट आणि जेवणानंतर १ तासाने पाणी प्यावे.जेवताना एक ते दोन घोट पाणी प्यायला हरकत नाही.
८) सकाळी फळांचा ज्युस प्या, दुपारी दही ताक किंवा मठ्ठा प्या, आणि झोपताना देशी गाईचे दूध देशी गाईचे तुप व हळद टाकुन प्या.
९) नेहमी पाणी पिताना हळुवार व खाली बसूनच घोट घोट पाणी प्यावे उभे राहून, गड़बडीने पाणी पिवु नये.
(शरीराला दररोज लाळेची गरज असते जेवताना थोड़ी लाळ पोटात जाते आणि बाकीची लाळ आपल्याला पाण्यातुनच शरीरात घालवावी लागते त्यासाठी पाणी घोट घोट करूनच प्या तसे केल्यास बरेच आजार दूर राहतात )
१०) नेहमी जेवण केल्यावर १० ते १५ मिनिट वज्रासनात बसावे. दुपारी जेवण केले की वामकुक्षी (२० मिनीट झोपावे) घ्यावी. आणि संध्याकाळी जेवण केल्यावर ३तास झोपु नये व शतपावली करावी.
११) अॅल्युमिनियमच्या भांड्यातील भोजन तसेच पाणी कधीच पिवु नये व काहीही खावु नये. अॅल्युमिनियम मधे बनवलेले जेवण करणे म्हणजे विष प्राशन करणे होय .
१२) भोजन करतांना नेहमी मातीच्या भांड्यांचा वापर करावा त्याबरोबर तांब्या,पितळाची भांडी पण वापरु शकतो.थोडक्यात ज्याचा वितळबिन्दु जास्त आहे अशीच भांडी वापरा.
१३) झोपताना नेहमी आकाशाकडे डोळे असावे असेच झोपावे आणि जमिनीशी जेवढा संपर्क तेवढे चांगले
१४) मैदा,डालडा,वनस्पती तेल, पामतेल, बेकरीचे पदार्थ अजिबातच खावु नयेत.
फिल्टर तेलच वापरा (रिफाईंड तेल विष आहे)
१५) सेंन्द्रिय गुळाचा वापर करावा (साखरेत गंधक असल्यामुळे विष आहे)
१६) पचन लवकर होण्यासाठी जेवणानंतर थोडासा गुळ खावा.
१७) जेवण बनवण्यासाठी फक्त सेंधा मीठ वापरा. (समुद्री मीठ वैद्यकीय सल्लानेच घ्यावे)
१८) कमीत कमी ६ ते ७ तास झोप आरोग्यासाठी पुरेशी आहे.
१९) दररोज एक तास प्राणायाम, १५ मिनीट योगासने, व जेवढे जमेल तेवढे सूर्यनमस्कार करणे.
२०) प्राणायाम मात्र नियमित करणेच
२१) रोज न चुकता एक आवळा किंवा आवळ्याचा रस प्यावा तसेच दुधी भोपळा, गाजर, बिट, मुळा, काकड़ी,कोबी यांचा वापर करावा
२२) जास्त वेळ पाय सोडून बसणे टाळावे, जास्त वेळ उभे राहणे, जास्त वेळ ड्रायव्हिंग करणे टाळावे. त्यापेक्षा जास्त वेळ मांडी घालून बसावे,उकड़ु बसावे, ज्यामुळे आपले मणके व सांधे चांगले राहतील
२३) भारतीय रस म्हणजे उसाचा रस,कोकम सरबत,आवळा रस, लिंबु सरबत, फळांचा ज्युस हेच आपल्या शरीराला उत्तम पोषक आहेत.
२४) भारतीय पोशाख घाला व तो सैल असावा, जास्त फिट टाईट नसावा. व शक्यतो पांढराच असावा.
२५) शरीराचे हे वेग आले की त्यांना रोखु नये. जर रोखले तर शरीरामध्ये ८४ प्रकारच्या व्याधि निर्माण होतात.
लघवीला आली की थांबवु नये, बसुनच लघवी करावी, अश्रु बाहेर येवु द्यावेत, वीर्याला थांबवु नये. रडायला आले तर ऱडावेच, हसायला आले की भरपुर हसावे, जांभई आली की द्यावीच, शिंक आली की बिनधास्त द्यावी ,अपानवायु आला की तसाच बाहेर येऊ द्यावा, संडास आली की थांबवु नये,
२६) कफ कधीच गिळु नये.

देवाशी संवाद ……..फरक फक्त विचारांचा

माणूस : देवा रागावणार नसशील तर एक प्रश्न विचारु का?
देव : विचार ना.
माणूस : देवा, माझा आजचा दिवस तू एकदम खराब केलास. असं का केलंस तू देवा?
देव : अरे काय झालं पण ?
माणूस : सकाळी अलार्म वाजलाच नाही . मला उठायला खूप उशीर झाला .
देव : बरं मग ?
माणूस : मग माझी स्कूटर पण चालू होत नव्हती . कशीबशी रिक्षा मिळाली .
देव : मग?
माणूस : आज कँटीन पण बंद . बाहेर सँडविच खाल्लं . ते पण बेकार होतं .
देव : (नुसताच हसला )
माणूस : मला एक महत्त्वाचा फोन आला होता . त्या माणसाशी बोलताना माझा फोनच बंद पडला .
देव : बरं मग
माणूस : संध्याकाळी घरी गेलो तर लाईट गेली होती.मी इतका थकलो होतो की ए .सी. लावून झोपणार होतो .
का तू असं केलंस देवा माझ्या बरोबर ?

देव : आता नीट ऐक .
आज तुझा मृत्यूयोग होता. मी माझ्या देवदूतांना पाठवून तो थांबवला. त्या गडबडीत अलार्म पण थांबला .
तुझी स्कूटर मी सुरू होऊ दिली नाही कारण स्कूटरला अपघात होणार होता .
कँटीनच्या जेवणातून तुला विषबाधा होणार होती. ते सँडविच वर निभावलं.
तुझा फोन मी बंद पाडला कारण समोरचा माणूस तुला एका कारस्थानात अडकवणार होता.
संध्याकाळी तुझ्या घरी शॉर्टसर्किट होऊन आग लागणार होती म्हणून मी लाईट घालवली .
माणूस : देवा मला क्षमा कर .
देव : क्षमा मागू नकोस. फक्त विश्वास ठेव. माझ्या योजनांविषयी कधीच शंका घेऊ नकोस .

आपल्या आयुष्यात जे बरं वाईट घडतं त्याचा अर्थ फार उशीरा लागतो आपल्याला
आपण खरंच देवावर श्रद्धा आहे असं म्हणतो. मग प्रार्थनेच्या वेळी डुलक्या का येतात ? तीन तासाच्या पिक्चर मध्ये जराही झोप येत नाही. …
आपल्या आयुष्याला सुंदर बनवणारे विचार आपण दुर्लक्षित करतो आणि नको ते मेसेज फॉरवर्ड करतो…..
देवाशीच संगत केली तर आपल्याला एकटं का वाटावं? तोच तर हलवतो सगळी सूत्र…..

माणूस हा सवडीनुसार ,वागत असतो…!
चहात माशी पडली तर चहा फेकून देतो,
पण साजूक तूपात माशी पडली तर तो
माशी फेकून देतो तूप नाही..
अगदी तसच…

आवडत्या माणसाने चूक केली तर
काहीही न बोलता ती पोटात घालतो पण
जर नावडत्याने केली तर आकांडतांडव
करून बोभाटा करतो.

‘माझं’ म्हणून नाही “आपलं” म्हणून जगता आलं पाहिजे …
जग खुप ‘चांगलं’ आहे फक्त चांगलं “वागता” आलं पाहिजे …
सगळं विकत घेता येतं पण संस्कार नाही।
कितीही केल तरी वाळवंटात आणि समुद्रात पिक घेता येत नाही

देह सर्वांचा सारखाच।
फरक फक्त विचारांचा।

*बासरी*

खुप सुंदर आहे अवश्य वाचाच..
*बासरी* …

बासरी तयार करण्यासाठी लागणारा बांबू हा तिथी पाहून तोडतात.

पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी या तिथींना बांबू तोडला तर त्याला हमखास कीड लागते, असं बासरी तयार करणारे सांगतात.

त्याचं कारण म्हणजे या तिथींमध्ये शेवटी ‘मी’ येतो. याच ‘मी’पणाच्या अहंकारातून कार्यनाश होतो आणि बासरी टिकत नाही, असा समज आहे.

कृष्णाचं आवडतं वाद्य बासरी. एकदा कृष्णाच्या सगळ्या सख्या, गोपी बासरीवर चिडल्या आणि म्हणाल्या,आम्ही त्या कृष्णाची एवढी स्तुती करतो, त्याच्या आजूबाजूला वावरतो,पण तो आम्हाला साधा भावही देत नाही.

तू तर एवढी साधी; ना रूप ना काही.पण तो तुला सतत ओठांशी धरून असतो.

तू अशी काय जादू केली आहेस त्याच्यावर? बासरी हसली आणि म्हणाली, ‘तुम्ही माझ्यासारख्या व्हा,मग कृष्ण तुम्हालाही जवळ घेईल.’

अर्थ न कळून गोपींनी बासरीकडे पाहिलं. बासरी पुढे म्हणाली, ‘मी अगदी सरळ आहे; ना एखादी गाठ, ना एखादं वळण. मी पोकळ आहे. त्या पोकळीतून माझ्यातला अहंकार गळून पडलाय.

माझ्या अंगावरच्या सहा छिंद्रातून काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे रिपू मी काढून टाकले आहेत.

मला स्वत:चा आवाजही नाही. माझ्या सख्यानं फुंकर मारली तरच मी बोलते.

तो जशी फुंकर मारतो तशी मी बोलते.’ गोपी निरुत्तर झाल्यl.

अहंकारहित शरीर ही *श्रीहरीची बासरी

After exam results….

प्रिय आई बाबा ,

बारावीचा निकाल लागला . तुम्ही अनुत्तीर्ण झालात . हो . . तुम्हीच ! वर्षभर सगळ्यांना सांगत होतात न ?? या कार्ट्याची कसली परीक्षा ? परीक्षा तर आमची . . . !! माझे सगळे मित्र , मैत्रिणी खूप चांगल्या मार्कांनी पास झाले . कारण परीक्षा त्यांनी दिली होती . घरच्यांनी त्यांना फक्त आधार दिला होता . . आई बाबा हाच आधार ना तुम्ही मला परीक्षेच्या आधी दिलात ना आता देत आहात . . .

तुम्ही म्हणता तुमच्या सर्कल मध्ये तुमची मान माझ्यामुळे खाली गेली . आई तू म्हणतेस माझ्या मूळे तुझी मान खाली गेली . आई बाबा माझे पण एक सर्कल आहे . तुमच्या सारखेच . तिथे माझीही मान खाली गेली आहे याची जाणीव आहे का तुम्हाला ?? ९५ % , ९० % , ८८ % या सगळ्या गराड्यात ७० % टक्क्यांचे तुमचे बाळ एकटे आहे हे तुम्ही ‘नोटीस ‘ केलंय का कधी ??

बाबा दोन चार दिवसांनी माझे मार्क्स हा विषय मागे पडेल . तुम्ही तुमच्या सर्कल मध्ये रमाल . आई तुझ्या ग्रुप मधली गॉसिप संपली की एका किटी पार्टी नंतर तू तुझ्या सर्कल मध्ये बिझी होशील . अचानक मी या ‘मार्क ‘ वाल्यांपासून वेगळा होतोय माझे सर्कलच नाहीसे होतंय हे तुम्हाला कसे समजत नाहीये ?? अचानक सगळे मार्कवाले एकत्र झालेत आणि मी त्यांच्यात असून पण एकटा पडलोय कारण यापुढे त्यांच्या वाटा आणि विषय हे माझ्या पेक्षा वेगळे आहेत . . तुम्हाला कधीच समजून घ्यावसं वाटत नाही ?

गेले २ दिवस आपण बोलत नाही आहोत . . . माझ्या कमी मार्कांनी आपल्यात खूप दुरावा निर्माण केलाय . तुमच्या पेक्षा किंवा तुमच्या पेक्षा जास्ती स्वप्ने मीही पाहीली होती . अभ्यास केला होता , पण नाही पडले मार्क . . . तुमच्या लेखी ७० % म्हणजे अनुत्तीर्ण ना ? हो मी फेल आहे . . . गुण पत्रिकेत ७० % पडण्य पेक्षा तुमच्या नजरेत माझी झालेली शून्य किंमत मला जास्ती टोचते . . . हे तुम्हाला कधी कळेल ?? रागाने तुम्ही माझ्या ११-१२ वी साठी झालेल्या खर्चाचा हिशेब माझ्यासमोर टाकून या मार्कांसाठी ओतला का इतका पैसा म्हणून जाब विचारलात . . . या प्रश्नाचे उत्तर मी काय देऊ ??

आई बाबा मला मार्क कमी पडले याचे दुक्ख , गिल्ट मला तुमच्या पेक्षा जास्ती आहे . . मी एकटेपणात आणि या गिल्ट मध्ये गुरफटत आहे . . मला जवळ घेऊन बाळ का कमी मार्क पडले असं विचाराल का ?? मला खूप रडायचं आहे . . . मला थोडं जवळ घ्याल का ?? आज मला मार्क कमी पडलेत म्हणून माझा वाटणारा तिटकारा , घरी होणारी धुसफूस , टोमणे यातून आपण एकमेकांपासून किति दूर जात आहोत . . .

कालांतराने १२ चे मार्क मागे पडतील . पण या प्रसंगात आलेली कटुता मागे पडेल का आई ?? ज्या वेळी मला तुमची सगळ्यात गरज आहे तेव्हा मला तुम्ही कोठेच दिसत नाही आहात . . . अशा वेळी मला आपल्या कामवाली च्या मुलाचे कौतुक वाटते . बिचारी प्वार फास झालं म्हणून पेढे द्यायला येते . . . बाबा तुमच्या माझ्या मधलं नातं या टक्क्यांवर आधारित आहे का ??

Just think about it…..

रागाला योग्य दिशा दिली तर….

रागावरती नियंत्रण करण्यास एक सुंदर उदाहरण —-
एका वकीलाच्या ऑफीसमध्ये संवाद –
“नेहमीप्रमाणे बसलो होतो. एक पक्षकार आले. हातात कागदाची पिशवी. रापलेला चेहरा. वाढलेली दाढी. मळलेली कपडे. म्हणाले.. सगळ्या च जमीनीवर स्टे लावायचा आहे. आणखी काय कागदं पाहीजेत? किती खर्च येईल?
मी त्यांना बसायला सांगितल. ते
खुर्चीवर बसले. त्यांची सर्व कागदपञे तपासली. त्यांच्याकडून माहीती घेतली. अर्धा पाउण तास गेला. मी त्यांना सांगितलं. मी अजून कागदपञे पाहतो. तुमच्या केसचा विचार करूया. तुंम्ही असं करा ४ दिवसांनी परत या.
४ दिवसांनी ते पक्षकार पुन्हा आले. तसाच अवतार. भावा बद्दलचा राग अजूनही कमी झाला नव्हता.मी त्यांना बसायची खूण केली. ते बसले.
मग मीच बोलायला सुरूवात केली. मी तुमची कागदपञे पाहीली.
तुंम्ही दोघे भाव. एक बहीण. आई वडील लहानपणीच गेले. तुमच शिक्षण ९ वी पास. धाकला भाव M.A.B.ed. तुंम्ही भावाच्या शिक्षणासाठी शाळा सोडली. रानात लंगोटीवर राबला. नेव्रा दाजीच्या हीरीवर दगड फोडली. सदाबापूच्या उसात च-या पाडल्या. पण भावाच्या शिक्षणाला पैसा कमी पडू दिला नाही.
एकदा बहीण शेतात गुरं चारत होती. तुमचा भाऊ शाळेतून आला होता. कसा तो म्हशीच्या आडवा गेला आणि त्याच्या अवघड जागी शिंग लागलं. चड्डी रक्तबंबाळ झाली. तुंम्ही खांद्यावरून त्याला बोरगावला नेलं. खर म्हणजे त्यावेळी तुमचं पण कळत वय नव्हत….फक्त कळती माया होती.. आई बापाच्या मागं यांचा मीच आई बाप ही भावना होती…
तुमचा भाव B.A ला गेला. उर भरून आला. तुंम्ही पुंन्हा जोमानं कष्ट उपसायला लागला. पण अचानक त्याला किडनीचा ञास सुरू झाला. दवाखानं केल..बाहेरचं केलं..पण गुण आला नाही..शेवटी डॉक्टरनं किडनी काढायला सांगितली.
तुंम्ही तुमची किडनी दिली.
हापीसर झाल्यावर खुप फिरायच आहे..नोकरी करायची आहे..तुला आमच्यापेक्षा लय ञास.. आंम्ही रानातली माणसं. आंम्हाला एक किडनी असली तरी चालतय.तुंम्ही बायकोच सुध्दा न ऐकता किडनी दिली.
भाव M.A ला गेला. होस्टेलवर रहायला गेला. गावात मटण पडलं..डबा नेवून द्यावा. शेतात कणसं आली..कणस नेवून द्यावी. कुठला सण आला.. पोळ्यांचा डबा द्यावा..घरापासून हॉस्टेलच अंतर २५ की.मी. पण तुंम्ही सायकलने गेला. घासातला घास घातला.
भावाला नोकरी लागली.. तुंम्ही गावात साखर वाटली..
३ वर्षीपुर्वी त्याचं लग्न झालं ..झालं म्हणजे त्यानंच केल. तुंम्ही फक्त हजर होता. पण तरी अभिमान होता..
भावाला नोकरी लागली. भावाच लग्न झालं..आता तुम्हाला आणि बायकापोरांना सुख लागणार होतं; पण झाल उलटच….
लग्न झाल्यापासुन भाव घरी येत नाही..बोलावलं तर म्हणतो; मी बायकोला शब्द दिलाय.. घरी पैसा देत नाही..विचारलं तर म्हणतो अंगावर कर्ज आहे.. गेल्यावर्षी कोल्हापुरात फ्लॅट घेतला. विचारल तर म्हणतो कर्ज काढून घेतलाय..
सगळ सांगून झाल्यावर मी थोडावेळ थांबलो.
नंतर म्हणालो …आता तुमचं म्हणण आहे की त्याने घेतलेल्या मिळकतीवर स्टे लावायचा ?
तो पटकन म्हणाला; हो बरोबर…
मी म्हणलं; स्टे लावता येईल. भावाने खरेदी केलेल्या मिळकतीमधला हिस्सापण मिळेल. पण……
पण तुंम्ही दिलेली कीडनी परत मिळणार नाही. तुंम्ही भावासाठी आटवलेलं रक्त परत मिळणार नाही. तुंम्ही त्याच्यासाठी खर्च केलेलं आयुष्यपण परत मिळणार नाही..आणि मला वाटतयं या गोष्टीपुढं त्यानं घेतलेल्या फ्लॅटची किंमत शुन्य आहे.
त्याची नियत बदलली. तो त्याच्या वाटंनं गेला. तुंम्ही त्याच वाटनं नको जाऊसा. तो भिकारी निघाला..तुंम्ही दिलदार होता.. दिलदारच रहा.. तुंम्हाला काहीएक कमी पडणार नाही.. उलट मी म्हणेन वडीलोपार्जित मिळकतीमधला तुमचा हिस्सा तेवढा पेरा..त्याचा हिस्सा पडीक राहुद्या.. कोर्ट कचेरी करण्यापेक्षा मुलांना शिकवा..शिकुन तुमचा भाव बिघडला ; म्हणुन पोरं बिघडणार नाहीत..
त्यान १० मिनीटं विचार केला.. सगळी कागद पिशवीत कोंबली.. डोळं पुसत म्हणाला; चलतो सायेब..
या गोष्टीला ५ वषॅ झाली. परवा तो पक्षकार अचानक ऑफीसला आला. बरोबर गोरागोमटा पोरगा. हातात कसलीतरी पिशवी.मी म्हणल बसा..तो म्हणाला , ‘बसायला न्हाय आलो सायेब, पेढं द्यायला आलोय’.
हा माझा पोरगा. न्युझिलॅंन्डला असतो. काल आलाय. आता गावात ३ मजली घर हाय. ८-९ एकर शेत घेतलय. तुंम्ही म्हणाला होता कोर्ट कचेरीच्या वाटला लागु नका.
मी पोरांच्या शिक्षणाची वाट धरली..
मला भरुन आलं… हातातला पेढा हातातच राहीला…”
रागाला योग्य दिशा दिली तर पुन्हा रागवायचि वेळ येणार नाही.

 

One more what’s up post…………….

Again not sure about the person who wrote it. Salute to that writer….

 

 

Great story – Ant and Wealthy man

Ant and Wealthy man

Truly Superb and a Big Eye opener…..

One Sunday morning, a wealthy man sat in his balcony enjoying sunshine and his coffee when a little ant caught his eye which was going from one side to the other side of the balcony carrying a big leaf several times more than its size. The man watched it for more than an hour. He saw that the ant faced many impediments during its journey, paused, took a diversion and then continued towards destination.

At one point the tiny creature came across a crack in the floor. It paused for a little while, analyzed and then laid the huge leaf over the crack, walked over the leaf, picked the leaf on the other side then continued its journey.

The man was captivated by the cleverness of the ant, one of God’s tiniest creatures. The incident left the man in awe and forced him to contemplate over the miracle of Creation. It showed the greatness of the Creator. In front of his eyes there was this tiny creature of God, lacking in size yet equipped with a brain to analyze, contemplate, reason, explore, discover and overcome. Along with all these capabilities, the man also noticed that this tiny creature shared some human shortcomings.

The man saw about an hour later the creature had reached its destination – a tiny hole in the floor which was entrance to its underground dwelling. And it was at this point that the ant’s shortcoming that it shared with the man was revealed. How could the ant carry into the tiny hole the large leaf that it had managed to carefully bring to the destination? It simply couldn’t!

So the tiny creature, after all the painstaking and hard work and exercising great skills, overcoming all the difficulties along the way, just left behind the large leaf and went home empty-handed.

The ant had not thought about the end before it began its challenging journey and in the end the large leaf was nothing more than a burden to it. The creature had no option, but to leave it behind to reach its destination. The man learned a great lesson that day.

Isn’t that the truth about our lives?

We worry about our family, we worry about our job, we worry about how to earn more money, we worry about where we should live – 5 bedroom or 6 bedroom house, what kind of vehicle to buy – a Mercedes or BMW or a Porsche, what kind of dresses to wear, all sorts of things, only to abandon all these things when we reach our destination – The Grave.

We don’t realize in our life’s journey that these are just burdens that we are carrying with utmost care and fear of losing them, only to find that at the end they are useless and we can’t take them with us…..

True KARMA (कर्म) in life

Definitely it will change your attitude towards
True KARMA (कर्म) in life

एकदा कृष्ण आणि अर्जुन एका गावाच्या दिशेने चालत निघाले होते.
अर्जुन कृष्णाला सारखा खोचकपणे विचारत होता, कर्णालाच का सगळे सर्वश्रेष्ठ दाता म्हणून संबोधतात आणि मला का नाही?

लगेच कृष्णाने समोरच्या दोन टेकडयांचे रूपांतर सोन्याच्या टेकडयांमध्ये केले आणि अर्जुनाला म्हणाला……

हे सगळे सोने गावकरयांमध्ये वाटून टाक
अट एकच एकूण एक सोने तू दान केले पाहिजेस.

लगेच अर्जून जवळच्या गावात गेला आणि तिथे त्याने जाहीर केले की…

मी प्रत्येक गावकरयांला सोने दान करणार आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने टेकडीपाशी यावे.
लोक अर्जूनाच्या मागे टेकडीच्या दिशेने चालू लागले.

पुढे अर्जुन छाती काढून चालत होता.

मागे गावकरी त्याचा जयजयकार करत होते.
दोन दिवस, दोन रात्री काम चालू होते.

अर्जून खोदत होता आणि सोने काढून लोकांना देत होता.

पण टेकडी थोडीदेखील संपली नव्हती.

लोक सोने घेऊन घरी जायचे आणि परत येऊन रांगेत उभे राहायचे.
आता अर्जून अगदी दमून गेला होता.

पण त्याचा अहंकार त्याला माघार घेऊ देत नव्हता.
शेवटी त्याने कृष्णाला सांगितले की बास….!

आता यापुढे मी काम करू शकत नाही.
मग कृष्णाने कर्णाला बोलावले आणि सांगितले की
या दोन सोन्याच्या टेकडया आहेत त्या तू लोकांना दान करून टाकायच्या……

लगेच कर्णाने पंचक्रोशीतील गावकरयांना बोलवले आणि सांगितले की…..

या दोन सोन्याच्या टेकडया तुमच्या आहेत.

एवढे सांगून कर्ण तिथून निघून गेला.

लोक सोने वाहून नेऊ लागले. अर्जून चकित होऊन पाहात बसला.

हा विचार आपल्या मनात का आला नाही.❓
या प्रश्नाने तो अस्वस्थ झाला.
कृष्ण मिश्कीलपणे
हसला आणि म्हणाला…..

अनावधानाने का होईना तू सोन्याकडे आकर्षित झालास…..!

तू गर्वाने प्रत्येक…….
गावक-याला सोने वाटू लागलास.

जणू काही आपण उपकार करतो आहोत अशा थाटात तू दान करत होतास…..!
कर्णाच्या मनात असले काहीही नव्हते.

त्याने दान केले आणि तो निघूनही गेला.
आपले कुणी कौतुक करतंय..
गुणगान गातंय……
हे पाहण्यासाठीदेखील
तो थांबला नाही.
व्यक्ती प्रकाशाच्या मार्गावर चालत असल्याचे हे लक्षण आहे.

देणगीच्या बदल्यात लोकांनी आपले कौतुक करावे…..
शुभेच्छा द्याव्यात….. धन्यवाद द्यावेत अशी अपेक्षा ठेवणे…..
म्हणजे ते काही निरपेक्ष दान नसते.
कुठल्याही परताव्याची अपेक्षा न ठेवता दान करावे