Stay strong stay happy

If you had Rs.86,400 in your account and someone stole Rs.10 from you, would you be upset and throw the remaining amount Rs. 86390 away at the person who took your Rs.10?
No..
You would move on and live. Right?
The same way we have 86,400 seconds each day. Don’t let someone’s negative 10 seconds ruin the remaining 86,390 seconds of your day.
Stay strong stay happy

कसं जगावं..?




मनुष्य गरीब असला की लोक म्हणतात पैसे कमवायची अक्कल नव्हती. त्यामुळेच चार पैसे कमवू शकला नाही..🤕🤕
श्रीमंत असला की म्हणतात, दोन नंबर करत असणार.. त्याशिवाय का कुणी आजकाल श्रीमंत होतं..? प्रामाणिकपणे वागून पैसे मिळत नाहीत. आम्ही चोवीस तास राब-राब राबतोय. झालो का श्रीमंत..?👳🏼👳🏼

पैशाच्या मागे धावू लागला की म्हणतात, पैशाची हाव सुटली आहे.. 💵💴🏃🏽
पैशाला जीवनात महत्व दिलं नाही तर म्हणतात, त्याच्या जीवनात काही महत्वाकांक्षाच नाही..! 😮😮

नुसतेच पैसे कमावले आणि खर्च न करता साठवून ठेवले, तर कवडी चुंबक म्हणतात.
चैन केली आणि जरा पैसा खर्च केला तर लगेच, उधळ्या म्हणतात.🤗🤗

वाडवडीलांची संपत्ती मिळाली तर त्याचेही सुख लोकांना पाहवत नाही. लगेच त्याला म्हणणार, बघा कसा बसलाय आयत्या बिळावर नागोबा..! स्वत:चं काही कर्तृत्व दाखवलं कधी आयुष्यात..?😴😴

आयुष्यात कष्ट करून पैसे कमावले तरी टोमणे काही सुटत नाहीत. म्हणतात, काय उपयोग आहे त्याच्या आयुष्याचा..? नुसता पैशाच्या मागे धावतोय पण सुख उपभोगायला वेळ नाही. असं आयुष्य काय कामाचं..?🚶🏼🚶🏽

जास्त भाविक असला तर म्हणतात, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव..🙂🙂
आणि मंदीरात नाही गेला तर नास्तिक म्हणतात.👺👺

तारुण्यात अकाली मृत्यू आला तर हळहळतात, अरेरे फार लवकर गेला. त्याचा भविष्यकाल उज्ज्वल होता. 🗣🗣
दीर्घायुषी झालात तर तेच लोक म्हणतील, अजून किती दिवस सरकारची पेन्शन खाणार कुणास ठाऊक..?💂🏼💂🏼

मनुष्य तब्येतीने बारीक असला तर झुरळ🕷 म्हणतात. जाड असला की हत्ती 🐘 म्हणतात. बारीक माणूस दिसल्यावर म्हणतात तुझ्याकडे पाहिलं की देशात दुष्काळ पडलाय असं वाटतं.🙁🙁 जाड मनुष्य बघितल्यावर म्हणतात हा दुष्काळ असल्या माणसांमुळेच पडतो..!👹👹

सहज कोणाला मदत केली तर म्हणतात, यामागे नक्कीच काहीतरी हेतू असणार.
नाही मदत केली तर म्हणणार, साधी माणूसकी नाही बघा..😱😱

सरळ स्वभावाचा असेल तर म्हणतात, अंगात थोडातरी स्वार्थ हवा.👨🏻👨🏻
स्वार्थी असलाच तर म्हणतात, माणसाचा स्वभाव सरळ हवा. स्वार्थाची संपत्ती काय कामाची..?🤓🤓

खेळकर स्वभाव असला तर म्हणतात, आचरट आहे. परिस्थितीचं गांभीर्य नाही. 😏😏
आणि गंभीर असणंही त्यांना रुचत नाही. म्हणतात, हसण्याची अलर्जी आहे याला. कोण जवळ येईल याच्या..!😂😂

तुम्ही यशस्वी झालात तरी यांना अडचण होते. म्हणतात, आमचं ऐकल्यामुळेच यशस्वी झाला.💁🏼💁🏼
अयशस्वी झालात तर म्हणणार, आमचं ऐकलं नाही. मग भोगा कर्माची फळं..!🙇🏻🙇🏼

लोकांचं काय घेऊन बसलात..? काहीही केलंत तरी त्याला नावं ठेवण्याची त्यांना सवय असल्याने त्यांचं म्हणणं किती मनावर घ्यायचं..? जग काय म्हणेल याची पर्वा करत आपलं जीवन का नासून घ्यायचं..?🤔🤔

मंगेश पाडगावकरांनी फार सुरेख शब्दात ही भावना व्यक्त केलीय..
फिदीफिदी हसतील ते हसू देत की.. बोटं मोडीत बसतील ते बसू देत की..!
आपण का शरमून जायचं..?
कशासाठी वरमून जायचं?
कशासाठी भयाने ग्रासून जायचं..?
फुलायच्या प्रत्येक क्षणी कशाला नासून जायचं..?
आपलं जीवन आपण ठरवायचं, कसं जगायचं..
कण्हत-कण्हत कि गाणं म्हणत, हे आपणच ठरवायचं..!



Nice line from Ratan Tata’s Lecture




👉🏿1.
Don’t educate your children to be rich. Educate them to be Happy.
So when they grow up they will know the value of things not the price.

👉🏿2.
“Eat your food as your medicines. Otherwise you have to eat medicines as your food.”

👉🏿3.
The One who loves you will never leave you because even if there are 100 reasons to give up he/she will find one reason to hold on.

👉🏿4.
There is a lot of difference between human being and being human. A Few understand it.

👉🏿5.
You are loved when you are born. You will be loved when you die. In between You have to manage…!

👉🏿6.
If u want to Walk Fast, Walk Alone..! But  if u want to Walk Far, Walk Together..!!

👉🏿7.
Six Best Doctors in the World-
1.Sunlight
2.Rest
3.Exercise
4.Diet
5.Self Confidence
&
6.Friends
Maintain them in all stages of Life and enjoy healthy life

👉🏿8.
If you see the moon …..
You see the beauty of God …..
If you see the Sun …..
You see the power of God …..
And …. If you see the Mirror …..
You see the best Creation of GOD …. So Believe in YOURSELF…..




असा कानमंत्र प्रत्येक आईने आपल्या मुलीला द्यावा




✍🏻आई झाल्यावर , मुली
तुला आईपणाचे भान येऊ दे
एकत्रित कुटुंबाचे संस्कार
तुझ्या बाळांच्या मनावर होऊ
दे✍🏻

✍🏻मतलबी जाळ्यात नवरा फसवून
अलिप्त संसार थाटू नको
स्वार्थाच्या हेकेखोर शस्त्राने
सासरच्या नात्यास छाटू नको✍🏻

✍🏻सासूशी उडणाऱ्या खटक्यात
बाळांना उगीच ओढू नको
आजी नातवाच्या नात्यावर
त्याचा राग काढू नको ✍🏻

✍🏻सासऱ्याच्या म्हातारपणावर
रागेवैतागे घसरू नको
नव्या-जुन्या पिढीमधील दुवा
तुच आहे , विसरू नको ✍🏻

✍🏻अगदी सख्या भावासारखं
दिराबरोबर तुझं भांडण होईल
पण तुझ्या लाडक्याना खेळणीही
तोच काका घेऊन येईल✍🏻

✍🏻लहान असो नाहीतर मोठी
नणंद तर चेष्टेने त्रास देणारच
मांडीवर घेत तुझ्या पिलांना
चिऊ काऊचा घास
भरवणारच✍🏻

✍🏻तुझं-माझं भेदभावनेने
जावेच्या पोरांचा द्वेष करू नको
वेळ प्रसंगी तीच्या लाडक्यांना
दोन घास जास्त देण्यास मागे सरू नको✍🏻

✍🏻घरातल्या क्षुल्लक कुरबुरिंना
द्वेषपुर्ण उत्तर देऊन काय करशील ?
अग, जशास तसे उत्तर देऊन
एक दिवस घराचे घरपण मारशील ✍🏻

✍🏻नातेवाईकाना धरुन राहिली तर
सर्वांच्या मनात घर करुन रहाशील
तुझ्या पाखरांची उंच भरारी
तू सर्वाबरोबर आनंदात
पहाशील✍🏻

✍🏻शेवटी जोडण्याचे संस्कार केले तर
मुलांच्या मनाचे तुकडे होणार नाहीत
आणि तुझ्या म्हातारपणाचे दिवसही
वृध्दश्रमात कधीच जाणार नाहीत…..




आनंदी राहा अणि आनंद वाटा




विपरीत परिस्थितीतही स्वतःला आनंदी ठेवणे ही कला. ती कला अवगत करणं जमलं कि, जगणं सुखकर बनलंच म्हणून समजा. होतं काय, आपण आनंदाचा शोध व्यक्ती, वस्तू किंवा परिस्थितीमध्ये शोधत असतो. आणि नंतर ती व्यक्ती, वस्तू किंवा परिस्थिती बदलली की आपण व्यथित, निराश किंवा हतबल होतो.

खरं तर आपल्या मर्जीशिवाय कोणीही आपल्याला कुणीही दुःखी बनवू शकत नाही. परंतु आपणच अनेकदा आपल्या आनंदाची चावी इतरांकडे सोपवून देतो. म्हणूनच आपल्या आयुष्यातील आनंद कायम ठेवण्यासाठी पुढील काही गोष्टी नक्कीच करा…

👉 रिअॅक्ट करण्यापेक्षा रिस्पॉन्स करणे शिका.

👉 भूतकाळ विसरा. भूतकाळ सोबत घेऊन चालू नका त्याने त्रासच होईल.

👉 स्वतःच्या मनात अपराधी भावना ठेवू नका. भूतकाळात झालेल्या चुका परत करायच्या नाही असा निर्धार करून पुढे चालत रहा.

👉 चांगली व वाईट वेळ येत राहील आणि जात राहील, हे सत्य स्वीकारा. यामुळे तुमच्या मनाची स्थिरता टिकून राहील.

👉 आनंद आणि प्रेम हा तुमचा स्वभाव आहे. तुमचा आनंद हा तुमच्या अवती-भोवती असलेल्या लोकांशी निगडीत आहे.

👉 विविधतेचा स्वीकार करायला शिका. विविधता ही सहन करण्याची नव्हे, साजरी करण्याची गोष्ट आहे. सगळे विश्व एक कुटुंब आहे या भावनेने जगाकडे पाहा.

👉 प्रेमाचे पुरावे मागत फिरू नका. प्रेम सिद्ध करावे लागणे हे फार कठीण काम ठरते.

👉 दररोज एक नवीन मित्र बनवा. फार गंभीर राहू नका. मनसोक्त हसा आणि जीवनाचा आनंद लुटा.

👉 कोणीही वाईट नसतं. काही लोक दिशा चुकतात हे लक्षात घ्या.

👉 कधीही हार मानू नका. प्रयत्न सुरूच ठेवा.

आनंदी राहा अणि आनंद वाटा. आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदी करा, एवढंच सांगणं…




How to stay motivated ?





In the jungle which animal is the biggest ……..

I heard you say, Elephant.

In the jungle which animal is the tallest ……..

I heard you say, Giraffe.

In the jungle which animal is the wisest ……..

I heard you say, Fox.

In the jungle which animal is the fastest ……..

I heard you say, Cheetahs.

Among all these wonderful qualities mentioned, where is the Lion in the picture.?

Yet, you say the Lion is the KING of the jungle even without ANY of these qualities.!!

Why??

Because…

The Lion is courageous,

The Lion is very bold,

The Lion is always ready to face any challenges, any barrier that crosses his path, no matter how big/bad they are.!!

The Lion walks with confidence. The Lion dares anything and is never afraid. The Lion believes he is unstoppable. The Lion is a risk taker. The Lion believes any animal is food for him. The Lion believes any opportunity is worth giving a try and never lets it slip from his hands. The Lion has charisma.!!

So…

– What is it that we get to learn from the Lion ??

• You don’t need to be the fastest.

• You don’t need to be the wisest.

• You don’t need to be the smartest.

• You don’t need to be the most brilliant.

• You don’t need to be generally accepted to achieve your dreams and be great in life.!!

• All you need is courage

• All you need is boldness

• All you need is the will to try.

• All you need is the faith to believe it is possible.

• All you need is to believe in yourself, that you can do it.!!

It’s TIME to bring out the Lion in you..!!

Stay motivated.

“Face the terrible, face it boldly”

– Swami Vivekananda




कुणीच कुणाच्या जवळ नाही




कुणीच कुणाच्या जवळ नाही
हीच खरी समस्या आहे
म्हणून जगण्यात पौर्णिमा कमी
आणि अमावस्या जास्त आहे .

हल्ली माणसं पहिल्या सारखं
दुःख कुणाला सांगत नाहीत
मनाचा कोंडमारा होतोय
म्हणून आनंदी दिसत नाहीत .

एवढंच काय
एका छता खाली राहणारी तरी
माणसं जवळ राहिलीत का ?
हसत खेळत गप्पा मारणारी
कुटुंब तुम्ही पाहिलीत का ?

अपवाद म्हणून असतील काही
पण प्रमाण खूप कमी झालंय
पैश्याच्या मागे धावता धावता
दुःख खूप वाट्याला आलंय.

नातेवाईक व कुटुंबातले
फक्त एकमेकाला बघतात
एखाद दुसरा शब्द बोलतात
पण काळजातलं दुःख दाबतात.

जाणे येणे न ठेवणे , न भेटणे , न बोलणे
या गोष्टी कॅज्युअली घेऊ नका
गाठी उकलायचा प्रयत्न करा
जास्त गच्च होऊ देऊ नका.

धावपळ करून काय मिळवतो
याचा जरा विचार करा
बँकेचे अकाउंट भरण्या पेक्षा
आपल्या माणसांची मनं भरा .

एकमेका जवळ बसावं बोलावं
आणि नेहमी नेहमी
तिरपं चालण्याच्या ऐवजी
थोडं सरळ रेषेत चालावं

समुद्री चोहीकडे पाणी
आणि पिण्याला थेंबही नाही
अशी अवस्था झालीय माणसाची
यातून लवकर बाहेर पडा.

माणसं अन माणुसकी नसलेली घरे
अन देव नसलेले देव्हारे
कितीही पॉश असले
तरी त्याचा काय उपयोग ..




माना कि थोडी sayco होती है




माना कि थोडी sayco होती है ।
लेकिन bayco तो bayco होती है ।

बायको म्हणजे कोण असते ?
बायको म्हणजे बायकोच असते .
कधी ती पायात लुडबुडणारी
मांजर असते ,

कधी ती लाडिक चाळे करणारी प्रेयसी असते , कधी ती अटीतटीने भांडणारी विरुध्द पार्टी असते .

कधी ती समजून घेणारी मित्र असते,
कधी त्रास देणारी डोकेदुखी असते ,
कधी मस्का लावणारी असते .

कधी ती जवळ असावी असे वाटतांना गैरहजर असते.

कधी न सांगता समजून घेते,
तर कधी गैरसमज करून घेते,
कधी मूलांची काळजी करते,
कधी स्वतःच्या रुपाची तारीफ करते,
कधी नव-याला नावं ठेवते,
कधी नव-याचा पगार वाढवुन सांगते.

कधी फिरायला नेल्यावर नखरे करते,
कधी हट्टाने हौस पुरवून घेते,
कधी हौसेने नवीन पदार्थ
करून खाऊ घालते.
….
कधी शॉपिंगने बेजार करते,
कधी नव-यासाठी कौतुकाने
काहीतरी खरेदी करते,
कधी कोणाची गुपितं सांगते ,
कधी कोणाला कळु न देता
गुपचूप कारभार उरकते.

कधी तंबी देऊन घराबाहेर सोडते,
कधी घरी यायची वाट बघत बसते.

कधी सरळ सुत असते ,
तर कधी संशयाचे भूत असते ,
कधी नव-याला लगाम घालु पाहते,
कधी नव-यावर प्रेमाचा वर्षाव करते.
कधी शेळी तर कधी वाघ असते, कधी आंबट तर कधी गोड असते .

कधी न म्हणते—की आज
मी दमले, दोन पेग मारते,
कधी न संपणारी घराची ऊर्जा असते
कितीही भांडली तरी
मुकाटयाने जेवायला घालते.
बायको कशीही असली तरी वरच्याने बरोबर शोधून best match
म्हणून आपल्याशीच जोडी
लावून दिलेली असते .

म्हणूनच सांगतो मित्राहो—
नल-दमयंती, रोमिओ-ज्युलिएट, लैला-मजनु आणि आर्ची-परश्या विसरून जा, आणि आपआपल्या बायकांना जीव लावा, काय करायचे तेवढे प्रेम बायकोवरच करा.

माना कि थोडी sayco होती है ।
लेकिन bayco तो bayco होती है ।

बायकाे नावाचं तुफान मोठं विचित्र असतं मित्रा, ते नवरा नावाच्या
इकडेतिकडे भिरभिरणा-या
फुलपाखराला एकाच
फुलामध्ये गुंतवून ठेवत.

आपण आजारी पडलो तर या तुफानाला झोप लागत नाही.
आपण बाहेरगावी जातो तेव्हा हे तुफान देहाने तर घरात असतं
पण मनानं ते आपल्याभोवती फिरत असतं.

आपण उदास असतो नां तेव्हा त्याच्या ओठावर हसु फुलत नाही आपण आनंदात असताना
या तुफानाचं दु:ख चेह-यावर येत नाही.

थोडक्यात काय तर या तुफानमुळेच
आयुष्यात चैतन्य आहे.
बाहेरच्या तारांकीत जगात
कितीही फिरलो तरी संध्याकाळी घरी जाण्याची ओढ लागते नां
त्याचं कारण हे तुफानच आहे.

साठीनंतरच्या वयात या
तुफानाचं खरं महत्व समजतं.
सगळं गणगोत विरोधात गेलं
तरी हे तुफान आपला हात सोडत नाही. आपल्या पोटात घास जाताे
तेव्हा या तुफानाला ढेकर येतो.
उतरत्या वयात आपल्याला जगायचं कारण फक्त आणि फक्त एकच असतं ते म्हणजे हेच ‘तुफान’…!
पाहीजे दोस्ता पाहीजे प्रत्येकाच्या आयुष्यात एक तुफान पाहीजे.




आपल्यातलं थोडसं सुख दुसऱ्याला देणे हेच खरं जीवन – Best What’s app message





विश्वास नांगरे-पाटील यांच्या पुस्तकातील एक अनुभव….

रेल्वे स्टेशनच्या जवळ सायकल लावण्यासाठी जागा होती. 30 रुपये महिन्याला द्यावे लागायचे.
तिथे सायकलींवर लक्ष ठेवण्यासाठी एक म्हातारी बाई बसलेली असायची. चार बांबू लावून वर कडबा आणि ताडपत्री लावून तयार केलेलं छत होत. त्यातच ती आजी राहायची. अंगावर एकदम जुनी फाटकी साडी…ती पण मळलेली. डोक्यावरचे केसपूर्ण पिकलेले होते. साधारण 70-75 वय असावे. तिथे एक जूनं गोणपाट होतं. त्यावरच बसलेली असायची.
थंडी पासून बचावासाठी एक काळी चादर पण होती. थंडीच्या दिवसात कायम अंगावर घेतलेली ती दिसायची. समोर एक जर्मनचे ताट आणि एक स्टीलची चेपलेली वाटी. एवढंच.
एवढं असूनही चेह-यावर कायम स्मितहास्य असायचं.
एक दिवस संध्याकाळी घरी जाताना मी सायकल काढत होतो तेव्हा तिने मला विचारलं, “बाळ, नाव काय तुझं…?”
मी नाव बोललो
कदाचित त्यांना ऐकू नाही गेलं किंवा नाव समजलं नाही. त्यांनी पुन्हा विचारलं. काय?
मी पुन्हा बोललो
त्या हसत हसत बोलल्या “अच्छा . छान आहे नाव”
त्यांनी मग इतर चौकशी केली. म्हणजे घरी कोण असतं? गाव कोणतं? नंतर सायकलीला अडकवलेल्या माझ्या बॅग कडे पाहून विचारलं, “डब्या मध्ये काही शिल्लक आहे का?” मी क्षणभर गोंधळलो. मग बोललो, “नाही ओ आजी”. का कुणास ठाऊक खूप वाईट वाटलं, नाही बोलताना. मग पुन्हा तोच हसरा चेहरा करून बोलल्या, “काही हरकत नाही पण कधी काही शिल्लक राहीलं तर टाकून देण्यापेक्षा आणत जा आणि मला देत जा”
हे सांगताना त्यांचा चेहरा जरी हसरा असला तरी त्यांचे डोळे ओशाळलेले वाटत होते. कदाचित त्यांना लाज वाटत होती असं काही मागण्याची पण मजबूरी होती त्यांची. उपाशी पोट कोणाकडूनही काहीही करवून घेतं. मी हो बोललो आणि निघालो.
घरी आल्यानंतर रात्री आईजवळ बसलो आणि त्या आजी बद्दल सांगितलं. तिला पण खूपवाईट वाटलं. दुस-या दिवशी सकाळी तिने न सांगता डब्यात 2 चपाती जास्त भरल्या आणि बोलली त्या आजीला दे. मला खूप बरं वाटलं. मी निघणार तेवढ्यात बाबांचा आवाज आला, “आता गेल्या गेल्या दे म्हणजे आताच ताजं खाऊन घेतील”
मी हो बोलून निघालो. त्या आजी झोपल्या होत्या. त्यांना उठवून चपाती आणि भाजी त्यांच्या ताटात काढून दिलं. त्या आजींच्या चेह-यावर वेगळाच आनंदं होता. त्यांच्या चेह-यावरील आनंदं पाहून मनाला खूप समाधान मिळालं.
दुपारी ऑफिस मध्ये जेवताना अचानक त्या आजीची आठवण आली आणि एक चपाती काढून ठेवली आणि मित्रांच्या पण डब्यात जे जेवण शिल्लक होतं ते माझ्या डब्यात भरून घेतलं.
संध्याकाळी मी तो डबा आजींना दिला. मग त्या गोड हसल्या. त्यांनी डबा रिकामा करून दिला आणि त्यातील अर्धी चपाती काढली त्याचे छोटे छोटे तुकडे केले आणि थोडं दूर जावून पसरून ठेवले आणि त्यांच्या जवळच्या वाटीत पाणी भरून त्या तुकड्याजवळ ठेवलं.
मी त्यांची प्रत्येक हालचाल पाहत होतो. त्या पुन्हा जवळ येऊन बसल्या. मी विचारलं, “आजी काय करताय हे ?”
त्या हसल्या आणि बोलल्या…बघ तिकडे. मी तिकडे पाहिलं तर काही चिमण्या आल्या आणि ते तुकडे खाऊ लागल्या आणि जवळच्या वाटीतील पाणी पिऊ लागल्या. मधेच एका चिमणीने एक तुकडा उचलला आणि उडून गेली.
कदाचित ती तो तुकडा आणखी एखाद्या भुकेल्या पिल्लासाठी घेऊन चालली होती.
त्यादिवशी जीवनाचा एक वेगळाच रंग दिसला. मी माझ्या डब्यातून काही घास त्या आजीला दिले होते आणि त्या आजीने तिच्या घासातील काही घास त्या चिमण्यांना दिलेत आणि त्या चिमण्यांनी पण काही भाग तिच्या पिल्लांसाठी नेला.
कदाचित हेच जीवन होतं. दुस-यासाठी थोडसं सुख घेवून जाणे.
जवळ जवळ एक वर्ष असच चालू राहीलं. नंतर माझं शिक्षण पूर्ण करून पुण्यात आलो जॉब साठी. चांगला जॉब मिळाला तेव्हा आवर्जून त्या आजींना पेढे देण्यासाठी गेलो. त्यांनी पेढा घेतला. अर्धा मला भरवला आणि डोळ्यात पाणी आणून बोलल्या “आठवणीने मला पेढा दिलास यातच समाधान आहे. माझ्या पोटच्या पोराने मला महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी आणलं आणि मला इथेच सोडून चुकवून निघून गेला. पण कोण कुठला तू… मला प्रेमाने पेढा दिलास खूप समाधान वाटलं. खूप मोठा हो….साहेब होशील मोठा तू ”
मी त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला आणि निघालो. तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की, या जगात आशिर्वाद आणि आनंदं मिळवण खूप सोपं आहे. म्हणजे एखाद्याला आपण आनंद दिला की, त्या बदल्यात आपल्याला समाधान, आनंद आणि आशिर्वाद मिळून जातात.
पण आयुष्य संपलं तरी आपण हे दुसरीकडे शोधत बसतो.
मध्ये वर्ष निघून गेलं. जॉब आता पर्मनंट झाला होता. म्हणून पेढा देण्यासाठी मी गेलो पण त्या तिथे नव्हत्या. त्यांचं साहित्य पण नव्हतं तिथे. फक्त दूर नेहमीच्या जागेवर ती वाटी होती.
मी जवळच्या टपरीवर गेलो
आणि विचारलं, “इथल्या आजी कुठे आहेत ?” त्याने मला पाहिलं आणि बोलला, “अरे वारल्या त्या. 2 महीने होवून गेले. ऐकून खूप वाईट वाटलं. मन सुन्न झालं. जणू कोणीतरी जवळचं गेलं होतं.
मी त्या वाटीकडे पाहिलं. कोरडी पडली होती. मी माझ्या जवळची पाण्याची बाटली काढली आणि ती वाटी पाण्याने भरली आणि त्यांच्या साठी आणलेला पेढा ठेवला तिथेच आणि निघालो तिथून. चालता चालता सहज मागे वळून पहिलं तर एक चिमणी त्या पेढ्यावर चोच मारून खात होती.
अस बोलतात की पिंडाला कावळा शिवला तर समजायचं की त्या व्यक्तिला मुक्ति मिळाली. त्या चिमणीला पाहून वाटलं कदाचित मुक्ति मिळाली त्या आजीला !!!
आपल्यातलं थोडसं सुख दुसऱ्याला देणे हेच खरं जीवन



‘I CAN’ and ‘I CANNOT’ by J. Alchem




Once upon a time,
There were two close friends.
Living as the first sight of humanity.
‘I CAN’ and ‘I CANNOT’ were their names……
‘I CAN’ was positive one,
According to ‘I CAN.’
“Everything was possible.”
I CAN travelled all over the world,
Climbed at the peak of highest mountain,
Gathered several impossible looking achievements,
And became a successful person!
While ‘I CANNOT’ was a negative one.
I CANNOT found impossible in every possible,
Neither had he climbed any Everest,
Nor gathered any achievement!
I CANNOT didn’t become a successful person.
But just sat on chair and thought only one thing- “I cannot”
After few years of friendship,
They fell in love with each other.
Why did they fall in love with each other?
It is a mystery.
Maybe because I CAN and I CANNOT be challenging to change into possible.
Maybe because love happens between odd
Maybe because they were too close to be in love!
Or
Maybe God was having plan for them.
Whatever it was, they were in love and finally got married.
Their generation started growing and today they are having billions of children all over the world.
Most of their children acquired the DNA of both ‘I CAN’ and ‘I CANNOT.’ They carry the mix thinking of their parents ‘I CAN’ and ‘I CANNOT’ and now they are confused whether ‘they can’ or ‘they cannot’
They are called ‘HUMAN BEINGS’