One of the best Whats App message




एकदा एका जंगलात एक हरीणी बाळाला जन्मं देणार असते.

पण ती ज्या ठीकाणी बसलेली असते तिथे जवळच एक वाघ तिच्यावर नजर ठेवून असतो.

एका बाजूला एक शिकारी तिच्यावर बंदूक रोखून उभा असतो. आणि जवळच जंगलात वणवा पेटलेला असतो.

सगळ्या बाजूने दिसणार्या या संकटांपैकी एकतरी संकट तिला गिळून टाकेल याची तिला खात्री असते.

तो शिकारी बंदुकीतून गोळी सोडतो…. वाघ जोरात झेप घेतो… आणि तितक्यात वीज चमकते… त्या शिकार्याचं लक्षं वेधलं जातं… आणि ती गोळी त्या वाघाला लागते…वीज चमकून गडगडाट होतो आणि पाऊस सुरु होतो… त्यामुळे वणवाही विझतो…

आणि

या सगळ्या गोष्टी होत असताना ती हरिणी हळूच एका लहानश्या हरणाला जन्मं देते…

माणसाचं आयुष्य हे असंच असतं…

त्याच्या हातात काहीच नसतं…

आपण फक्तं प्यादी असतो या पटावरची…

कर्ता करविता असतो तो ईश्वर…

एक एक वाटत असताना कुठल्या क्षणी काय होईल काहीच सांगता येत नाही…

मारणाराही तोच असतो आणि तारणाराही तोच…

कर्माचा सिद्धांत हा कीतीही खरा असला तरी शेक्सपिअरचं एक वाक्यं खूप काही सांगून जातं…

‘Behind every misfortune there is a crime… But behind every crime there is a misfortune…!’

आयुष्य हे असंच असतं… कुणाला दोष द्यावा आणि कुणाचं कौतुक करावं… दोन्ही एकाच रथाची चाकं…

कुठलं खड्डयात अडकणार आणि कुठलं वर टांगून राहणार हे ठरवणारा मात्र तोच…

‘समुद्रात बुडून त्याचा म्रुत्यु झाला’…पण त्याच्या मनातून समुद्राकडे तो त्याक्षणी कसा ओढला गेला? कोण सांगेल?

‘चाळीस घरांच्या ढिगार्याखाली गाडलं गेलेलं सहा महीन्यांच बाळ, 30 तासांनंतरही तसच छान हसत खेळत सापडतं’…

त्याला त्या ढिगार्यातही कुशीत घेणारं कोण असतं?

‘नेहमीच्याच रस्त्याने जाणारी एक बस अचानक एक दिवस दरीत कोसळते.’ तिला दरीत ढकलणारं असतं कोण? वारा? की ड्रायव्हर? की ड्रायव्हरच्या डोळ्यासमोर अचानक आलेला अंधार? कोण सांगेल?

एका मुलाच्या रोजच्या नेहमीच्या ट्रेनमधे बाम्बस्फोट होतो… पण तो त्यादिवशी ऑफिसला गेलेलाच नसतो… त्यामुळे तो वाचतो…

ऑफिसला न जाण्याची इच्छा त्याला त्याच दिवशी का होते? कोण सांगेल?

त्या हरिणीच्या बाळाचा जन्मं होताना अचानक वीज का चमकली? कोण सांगेल? कोण सांगेल कोण?? कुणीच नाही…
हे असंच असतं… भक्तीने रुजवलेलं … प्रेमाने सावरलेलं… आसक्तीने बुडवलेलं… कर्माच्या चक्रात अडकलेलं… ईश्वराने लिहीलेलं … आपलं आयुष्यं…!

मोर नाचताना सुद्धा रडतो… आणि.. राजहंस मरताना सुद्धा गातो….

दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही… आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.

यालाच जीवन म्हणतात.

किती दिवसाचे आयुष्य असते? आजचे अस्तित्व उद्या नसते, मग जगावे ते हसून-खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नसते…!!
नशिबाने दिलेल्या पदाचा गैरवापर करू नका…..
कोणाचा अपमान करू नका आणि कोणाला कमीही लेखू नका…..
– तुम्ही खूप शक्तिशाली असाल,
पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे…..
– कोणी कितीही महान झाला असेल,
पण निसर्ग कोणाला कधीच लायकीपेक्षा महान बनण्याचा क्षण देत नाही…….
स्वतःवर कधीही अहंकार करू नकोस……
देवाने तुमच्या-माझ्यासारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं……

-स्वामी विवेकानंद




 

The Abundance Principle | Best Whats app messages

One of the best whats app message:

Once a man got lost in a desert. The water in his flask had run out two days ago, and he was on his last legs. He knew that if he didn’t get some water soon, he would surely die. The man saw a small hut ahead of him. He thought it would be a mirage or maybe a hallucination, but having no other option, he moved toward it. As he got closer, he realized it was quite real. So he dragged his tired body to the door with the last of his strength.

The hut was not occupied and seemed like it had been abandoned for quite some time. The man entered into it, hoping against hope that he might find water inside.

His heart skipped a beat when he saw what was in the hut – a water hand pump…… It had a pipe going down through the floor, perhaps tapping a source of water deep under-ground.

He began working the hand pump, but no water came out. He kept at it and still nothing happened. Finally he gave up from exhaustion and frustration. He threw up his hands in despair. It looked as if he was going to die after all.

Then the man noticed a bottle in one corner of the hut. It was filled with water and corked up to prevent evaporation.

He uncorked the bottle and was about to gulp down the sweet life-giving water, when he noticed a piece of paper attached to it. Handwriting on the paper read : “Use this water to start the pump. Don’t forget to fill the bottle when you’re done.”

He had a dilemma. He could follow the instruction and pour the water into the pump, or he could ignore it and just drink the water.

What to do? If he let the water go into the pump, what assurance did he have that it would work? What if the pump malfunctioned? What if the pipe had a leak? What if the underground reservoir had long dried up?

But then… maybe the instruction was correct. Should he risk it? If it turned out to be false, he would be throwing away the last water he would ever see.

Hands trembling, he poured the water into the pump. Then he closed his eyes, said a prayer, and started working the pump.

He heard a gurgling sound, and then water came gushing out, more than he could possibly use. He luxuriated in the cool and refreshing stream. He was going to live!

After drinking his fill and feeling much better, he looked around the hut. He found a pencil and a map of the region. The map showed that he was still far away from civilization, but at least now he knew where he was and which direction to go.

He filled his flask for the journey ahead. He also filled the bottle and put the cork back in. Before leaving the hut, he added his own writing below the instruction: “Believe me, it works!”

_This story is all about life_. – The Morals

It teaches us that *_We must_ GIVE _before We can_ RECEIVE _Abundantly_*.

More importantly, it also teaches that *FAITH _plays an important role in_ GIVING*.

The man did not know if his action would be rewarded, but he proceeded regardless. *_Without knowing what to expect, he made a_ Leap of Faith*.

Water in this story represents the *Good things in Life* – something that brings a _*smile to your face*_. It can be _Intangible Knowledge_ or it can represent _Money, Love, Family, Friendship, Happiness, Respect, or any number of other things you Value_ – *Whatever it is that you would like to get out of life* – that’s water.

The water pump represents the _*Workings of the Karmic Mechanism*.

Give it some *”Water”* to *Work with*, and it will *RETURN _far more than you put

Dhyan Chand Story | Major Dhyan Chand and Hitler’s story | ध्यानचंद




आज २९ ऑगस्ट, ध्यान चंदचा जन्मदिवस भारताचा राष्ट्रीय खेळ दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिम्मित ध्यानचंदची एक गोष्ट.

१९३६, ध्यानचंद- हिटलर भेट

पारतंत्र्यात खितपत पडलेल्या बहुसंख्य हिंदुस्थानी जनतेकरिता कुठल्याही वर्षातील एखाद्या सामान्य दिवसा प्रमाणेच हाही एक दिवस होता.

परंतु हॉकी या खेळामध्ये जागतिक स्तरावर याच दिवशी भारताचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवले जाणार होते.

त्या वर्षीचे जागतिक ऑलीम्पिक खेळ जर्मनीत साजरे होत होते. स्वत:च्या मनगटाच्या जोरावर हिंदुस्थानी चमू अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता.

आता गाठ होती बलाढ्य जर्मन संघाशी.

त्यांचीच खेळपट्टी, त्यांचाच देश आणि त्यांचेच प्रेक्षक.

शिवाय जर्मनीचा सर्वेसर्वा अडॉल्फ हिटलर आपल्या टीमला उत्तेजन देण्यासाठी स्वत: जातीने हजर असणार, असे कळले होते.

याप्रमाणे जर्मन खेळाडूं करिता सर्व परिस्थिती अत्यंत अनुकूल होती आणि त्यामुळे त्यांना आणखी एक सुवर्ण पदक खिशात टाकल्यासारखेच वाटत होते.

खेळाला सुरुवात झाली.

मैदानाच्या मध्यभागी चरखा असलेल्या तिरंग्याला आपल्या खेळाडूंनी वंदन केले
आणि वंदे मातरम् या गीताचे गायन केले.

स्टेडीयम प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. फ्युरर आणि त्याचे अनेक सेनापती प्रेक्षकांत बसलेले दिसत होते.

पहिल्या अर्ध्या वेळाचा खेळ संपला, तेव्हा एका गोलने हिंदुस्थानची सरशी झालेली होती.

जर्मनीची बलाढ्य टीम एकही गोल करू शकली नव्हती.

दुसऱ्या भागाच्या खेळाला सुरुवात झाली. परंतु आता हिंदुस्थानी खेळाडू मैदानावर घसरून सटासट पालथे पडू लागले;
कारण पहिल्या भागातील हिंदुस्थानी खेळाडूंचा आवेशपूर्ण आणि चपळ खेळ बघून जर्मन कोचच्या पोटात गोळा आला आणि आता पराभव अटळ आहे, हे त्याने ओळखले.

मधल्या वेळात जर्मन कोचने मैदानात सर्वत्र पाणी शिंपडण्याची व्यवस्था केली.

हिंदुस्थानी खेळाडू कॅन्व्हासचे निकृष्ठ दर्जाचे सामान्य बूट घालून खेळत होते.

ओल्या मैदानात ते एकेक करून भुईसपाट होऊ लागले.

जर्मन खेळाडूंचे बूट उत्कृष्ठ दर्जाचे होते व त्यामुळे ओल्या मैदानाचा त्यांच्या खेळावर फारसा परिणाम झाला नाही.

सामना हिंदुस्थानी खेळाडूंच्या हातून निसटतो की काय, असे वाटू लागले.आपल्या संघाचे नेतृत्व करीत होता ध्यान चंद.

आपला खेळ का खराब होत आहे, हे त्याच्या लगेच लक्ष्यात आले.

त्याने कॅन्व्हासचे बूट काढून फेकून दिले आणि अनवाणीच खेळायला सुरुवात केली.

ध्यान चंदने जबरदस्त चढाई सुरू केली आणि क्षणार्धात खेळाचा रंग पालटला.

आठास एक असा आपण सामना जिंकला.

आठांपैकी सहा गोल तर ध्यान चंदनेच लगावले होते.

जर्मन चमूची जर्मनीतच जर्मन प्रेक्षकांसमोर नाचक्की झाली.

सुवर्ण पदक हिंदुस्थानने हिसकावून घेतले.

हिटलरला आपल्या टीमचा पराभव सहन झाला नाही.

तो आणि त्याचे सेनापती पाय आपटीत क्रुद्ध होऊन स्टेडीयममधून चालते झाले.

त्याच दिवशी सायंकाळी हिटलरच्या कचेरीतून तातडीचा संदेश आला.

फ्युररने ध्यान चंदला भेटीसाठी बोलाविले होते.

ध्यान चंद आणि इतर हिंदुस्थानी खेळाडू अत्यंत अस्वस्थ झाले.

जर्मनीचा ऑलीम्पिक हॉकीमधील पराभव हिटलरला फार लागून राहिला आहे, हे सर्वांनाच माहीत होते.

जखमी सिंहाच्या गुहेतून ध्यान चंद सुखरूप माघारी येईल की नाही, याची सर्वांनाच काळजी वाटत होती.

त्या रात्री कोणालाच नीट झोप लागली नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळीच ध्यान चंदला हिटलरसमोर उभे करण्यात आले.

सव्वापाच फूट उंचीच्या आणि किरकोळ शरीरयष्टीच्या त्या तरुणाला बघून फ्युररला नवल वाटले.

त्याने ध्यान चंदच्या भिकार कॅनव्हास बुटांकडे एक नजर टाकली आणि गुर्मीतच विचारले:

‘हे तरुण माणसा, तू हॉकी तर उत्तमच खेळतोस.
पण त्याशिवाय आणखी काही काम करतोस का?’

‘होय सर, मी हिंदुस्थानी सैन्यात आहे’,
ध्यान चंद म्हणाला.

हिटलर: ‘सैन्यात तू कोणत्या पदावर आहेस?’.

‘लान्स नाईक, सर’, ध्यान चंद उत्तरला.

‘सोडून दे इंडियन आर्मी, सोडून दे हिंदुस्थान आणि जर्मन नागरिक हो. आमच्या बाजूने हॉकी खेळत जा. मी तुला जर्मन सैन्यात बडा अधिकारी बनवतो’: हिटलर.

हिटलरचे हे बोलणे ऐकून ध्यान चंद बुचकळ्यात पडला.

मातृभूमीला अंतर देण्याची कल्पनाही त्याला सहन होणे शक्य नव्हते.

तो सच्चा देशभक्त होता. परंतु हिटलरचा प्रस्ताव नाकारणे म्हणजे प्रत्यक्ष यमधर्माला आव्हान देणे होय, हे त्याला माहीत होते. पण तो सच्चा सैनिक मरणाला घाबरत नव्हता. त्याने शुद्ध हिंदी भाषेत उत्तर दिले: ‘क्षमा असावी, सर.

ते शक्य नाही.

माझे माझ्या मातृभूमीवर प्राणापलीकडे प्रेम आहे’.

(या ठिकाणी मला संभाजी महाराजांनी औरंगजेबाला दिलेले सडेतोड उत्तर आठवते: ‘स्वधर्मे मरणम् श्रेय: | परधर्मो भयावह: || ).

हे सर्व होत असताना हिटलरचे अनेक सैनिकी अधिकारी तेथे होते.

उद्दामपणे हिटलरला नकार देणाऱ्या या तरुणाचे आता काय होणार, या विचाराने ते अस्वस्थ झाले.

परंतु हिटलर इतकेच म्हणाला:
‘जा, पड खितपत. तुझी मर्जी’.

नंतर हिटलर खाडखाड बूट वाजवत निघून गेला.

ध्यान चंदने पाठोपाठ तीन ऑलीम्पिक खेळांत (१९२८, १९३२ व १९३६) भारताला सुवर्ण पदके मिळवून दिली.

त्या कामगिरीकरिता पद्मभूषण हा सन्मान देऊन भारत सरकारने ध्यान चंदचा १९५६ साली सन्मान केला.




A very nice article written by Nana Patekar in his blog

एक पिढी शिक्षण घेऊन गाढव बनली आणि आता नवी पिढी शिक्षण घेताना रेसचा घोडा बनत आहे.

परीक्षेत १००% पाहिजेत, कराटे क्लासमध्ये Black बेल्ट मिळवायचा आहे.
त्यानंतर Dance क्लास attend करायचा. भगवतगीता स्पर्धेत जायचं आहे. श्लोकांचा अर्थ कळला नाही तरी ते तोंडपाठ करायचेच.
कारण first prize मिळालंच पाहिजे !!
मग drawing competition असते. तिथून बाहेर निघाला की चालला तबला वाजवायला… संगीत विशारद बनायला.

Albert Einstein बनवून देणाऱ्या Multi -National School आल्या. पण Albert हा Einstein बनण्यासाठी शाळेत गेला नव्हता.
एक अमिताभ बनला तर हजारो acting school उभ्या राहिल्या. पण अमिताभ अभिनेता बनण्यासाठी कोणत्याही School मध्ये गेला नव्हता.
आता लवकरच मोदी तयार करणाऱ्या शाळा उभ्या राहतील. आणि पालक लाखो रुपये फी भरून त्यात मुलांना पाठवतील.
आज मुलाच्या शिक्षणासाठी जेवढा खर्च एका वर्षाला होतो, तितके रुपये त्याच्या पालकांना संपूर्ण शिक्षण घेण्यासाठी सुद्धा लागले नाहीत.

आता शाळा सुरु केल्या आहेत investors नी. मागणी तसा पुरवठा ह्या तत्त्वावर. पालकांना आपल्या मुला-मुलीला रेसचा घोडा बनवायचं आहे,
ही मागणी पाहून जास्तीत जास्त अभ्यास मुलांच्या डोक्यात कोंबायला सुरुवात केली. दप्तराचं आणि पालक-शिक्षकांचं अपेक्षांचं ओझं वाहणारी मुले म्हणजे
चालती बोलती प्रेते बनत चालली आहेत.
जरा शुद्धीवर आली की “what is square of 12?” असं विचारून त्यांचं बालपण चिरडून टाकतात.

श्री मोदी ह्यांनी मुलांना एक प्रश्न विचारला होता-”
तुमच्यापैकी किती जण घाम गळेपर्यंत खेळतात?” तेव्हा एकाही मुलाने हात वर केला नाही.
कारण आता मुले AC मध्ये जन्म घेतात, AC मध्ये वाढतात. चिप्स खातात, soft ड्रिंक पितात आणि mobile वर game खेळत बसतात.
ऊन, पाऊस, वारा ह्याच्याशी संबंध येत नाही.
पडणं-लागणं, खेळात हरणे माहीतच नाही. School bus आली नाही तर शाळेपर्यंत चालत जाण्याची ताकद मुलांमध्ये नाही.
वय वर्ष ६ पार होत नाही तर डोळ्याला चष्मा लागतो. हात पायांच्या एक तर काड्या होतात नाहीतर लठ्ठपणा वाढतो.
कारण शारीरिक कष्ट संपले आणि Modified food starch, maltodextrin, hydrolyzed corn gluten, disodium inosinate/ guanylate, yeast extrac, hydrolyzed soy protein मिसळलेले पदार्थ खाणे सुरु झाले. ह्या ingredients ची खासियत म्हणजे ते मुलांच्या पोटात शिरून जास्त काळ टिकतात आणि पोटातील पोषके शोषून घेतात. मुलांची
hormonal आणि जैविक वाढ रोखतात.
ज्यामुळे मुले दुबळी होत जातात. हे घटक पिझ्झा-बर्गरमध्ये असतात.
म्हणून भारत लवकरच diabetes चे सर्वाधिक रुग्ण असलेला देश बनणार आहे. सोबत इतरही विकार येत आहेत.

शेंगदाणे, चणे, रवा, तांदूळ, बाजरी, सुका मेवा आणि फळे ह्यात घातक ingredients नसतात.
लापशी, सातू, शिरा, पोहे किंवा अंड्याचे घरी बनवलेले पदार्थ मुलांना उत्तम पोषण पुरवतात.
ते मिळत नसल्यामुळे मुलांची शारीरिक वाढ नीट होत नाही. प्रतिकार क्षमता संपते. मग vitamins , DHA , minerals देणारे product विकत आणून ते खायला
देतात. वास्तविक, शरीर हा जगातील सर्वात मोठा कारखाना आहे. ह्याच शरीराला योग्य आहार, कष्ट मिळाले तर कुठेही तयार न होऊ शकणारं रक्त
तयार होतं. साध्या भाज्या,अस्सल भारतीय जेवण मिळालं की शरीराची यंत्रणा स्वतः काम करते.
म्हणून ताज्या भाज्या, भाकरी खाणारी आणि मिनरल्स, calcium , proteins माहीत नसलेली माणसे १०० वर्षे जगली
आणि हे माहीत झालेली माणसे फक्त ६० वर्षे जगतात…तेही अनेक रोग सोसत, औषधे घेऊन !!

खेळ, व्यायाम, भटकंती आणि दर्जेदार वाचन न केल्यामुळे मुलांना मानसिक कमतरता जाणवते.
संघर्ष माहीत नसतो आणि team work कळत नाही. मित्र फक्त WhatsApp , face बुक वर भेटतात. प्रत्यक्ष भेट नाही.
सुख-दुःखाची देवाण-घेवाण नाही आणि मित्राचा-मैत्रिणीचा मानसिक आधार नाही. दिलखुलास हसणे आणि ओक्साबोक्शी रडणे मानसिक आरोग्यासाठी चांगले असते. ह्या दोन्ही
क्रिया मुलांना करता येत नाहीत. आपोआपच, जरा मनाविरुद्ध घडलं की लहान मुले-मुली आत्महत्या करतात. बरीच एकुलती एक मुले दुसर्याशी जमवून घेण्याची सवय नसल्यामुळे
पुढे लग्न झाल्यावर वर्षभरात घटस्फोट घेतात. ज्या मुलांना बहीण नसते, चांगली मैत्रीण नसते त्यांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन संकुचित बनतो.
ह्या उणिवांचा शिक्षणात विचार केलेलाच नाही. भारतीय शिक्षण पद्धत सर्वांगीण नाही हे शिक्षण तज्ज्ञ सांगत होते तोवर शिक्षणाचा धंदा सुरु झाला. मोठे उद्योजक, पुढार्यांनी
शाळांमधून गुंतवणूक करून शिक्षण संकल्पनेला धूळ चारली. एखादी स्त्री गरोदर राहिली तर जन्माला येणाऱ्या जीवाच्या admission ची तयारी सुरु होते.
कृष्णाला जन्मण्याआधी मारायची तयारी मामाने केली होती. आता मुल जन्माला येण्याआधी त्याला रेसचा घोडा बनवायची तयारी सुरु होते. आता मुलाने बोलायला सुरुवात केली
की थेट E =MC square म्हणायचं बाकी राहिलं आहे.

अशी मुले सर्व formula पटापट म्हणून दाखवतील पण स्वतःचा formula कधीही शोधू शकणार नाहीत. guitar शिकतील पण स्वतःची संगीत रचना करू शकणार नाहीत.
लता मंगेशकर, सचिन तेंडूलकर, मेरी कोम ह्यांचं अनुकरण अचूक करतील. पण स्वतःची ओळख निर्माण करणार नाहीत.

कारण त्यांना फक्त अनुकरण करायला शिकवलं जातं. जगायची कला, गीत-संगीतातील आनंद, निसर्ग संपदेची भव्यता, नव्या संकल्पनांची निर्मिती, जुन्या विचारांचा आधार,
साहित्य ह्याला बाजारू किंमत नसल्यामुळे फक्त जे विकलं जातं तेच ज्ञान मुलांना मिळतंय, त्यात ते पारंगत होत आहेत. काही जणांना campus मध्ये दर महिना ४ लाखांपेक्षा जास्त
पगार असणारी नोकरी मिळतेय….पण त्यात देशाचं नाही, भांडवलदारांच हित साधला जातंय. पुढची पिढी मोठी पदवी मिळवेल पण न स्वतः जगण्याचा आनंद लुटू शकतील,
न दुसर्याला जगण्याची मजा मिळू देतील…

अगदी हाच धोका ओळखून जपानमध्ये शाळेत AC लावत नाहीत. तिथे मुलांना घोकंपट्टी पेक्षा practical वर भर देतात. वृक्ष-वेली स्वतःच अन्न स्वतः तयार करतात त्या
प्रक्रियेला काय म्हणतात?…असे प्रश्न विद्यार्थ्यांना न विचारता शाळेत व बाहेर भाजी लावायला शिकवतात.
त्या रोपांची-वेलींची जोपासना करायला लावतात.
“निप्पोन technology ” ने केलेल्या तपासणीत म्हटलं आहे की शाळेच्या आवारातील वेलींमुळे तापमान चार अंश कमी झालं आहे.
आणि मुले पाना-फुलांसोबत भावनिक नातं जोडू लागली आहेत. जर्मनी मुलांना Transference शिक्षण देते.
तिथे लहान मुलांची बोटे नाजूक असतात हे लक्षात घेऊन दुसरीपर्यंत लेखन करू देत नाहीत.
पाचवीपर्यंत practical चालतं आणि त्यानंतर विद्यार्थी बँक कर्मचारी बनेल की हवाई सेविका, प्रशासन सांभाळेल की कुशल कामगार होईल ह्याची सतत तपासणी होते.
दहावीनंतर फक्त त्याला आवडणाऱ्या क्षेत्राचं प्रशिक्षण देतात. सगळे एकदम science मध्ये भरत नाहीत. अनावश्यक विषय शिकवत नाहीत. चीन हा cycle प्रेमी देश
४ वर्षाच्या मुलांना cycle चालवण्याचं शिक्षण देतो. त्यानंतर theory कमी आणि प्रत्यक्ष कृती शिकवतात.

प्रत्येक विद्यार्थी उद्या देश चालवणार ह्याचा विचार Netherlands सारखा देशही करतो. एकाच विद्यार्थ्यावर सगळ्या विषयांचा मारा करत नाहीत. चारी दिशांनी अनेक विषय
आणि क्लासचा मारा सोसण्याचे काम भारतीय विद्यार्थ्यांना करावे लागते.

शिक्षण काय असतं?
रवींद्रनाथ टागोर काय म्हणतात पहा. टागोरांची “शांतीनिकेतन” शाळा झाडांखाली भरत असे. पक्ष्यांची किलबिल ऐकू येई.
एकदा टागोर झाडाखाली बसले होते. चार विद्यार्थी त्यांच्या समोर पुस्तकात डोक खुपसून बसली होती.
आणि उरलेली बरीच मुले खेळत-बागडत होती.
कोणी झाडावर चढला होता, कोणी फुलांचा सुगंध घेत फिरत होता.
तेवढ्यात एक पालक तिथे आले. पाहतात तर काय…गुरुदेव शांतपणे बसले होते आणि फक्त चार मुले पुस्तकात डोके खुपसून बसली होती व इतर मुले हसण्यात-नाचण्यात रमली
होती. सुटा-बुटातील पालक महाशय टागोरांना म्हणाले-“या नाचणाऱ्या-बागडणार्या मुलांच्या भवितव्याची तुम्हाला चिंता वाटत नाही का?”
टागोर म्हणाले-
“चिंता वाटते, पण नाचणाऱ्या-बागडणार्या मुलांची नाही तर पुस्तकात तोंड खुपसून बसलेल्या मुलांची.
ही मुले खेळण्या-
बागडण्याच्या वयात मोठ्या माणसांसारखी वागत आहेत. ही मुले लहान वयात प्रौढ झाली आहेत. प्रौढ तर मीसुद्धा अजून झालो नाही.
खरं तर मलाही झाडावर चढावं असं वाटतं. पक्ष्यांशी बोलावंसं वाटतं. भरपूर खेळावंसं वाटतं. पण माझं शरीर आता साथ देत नाही. “
टागोर जगण्यासाठी शिकवत होते. आता शिकण्यासाठी जगावे लागते. जास्त ज्ञान, जास्त कला घेऊन मुले धावत असतात.

आणि पालक त्यांच्यावर पैसे लावतात ! मग एक रेस सुरु होते
आणि जगायचं राहून जातं !!