Amitabh Bachchan – प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व




बच्चन, अमिताभ : (११ ऑक्टोबर १९४२). हिंदी चित्रपटसृष्टीतील महान अभिनेता. जन्म अलाहाबाद येथे.
त्यांचे वडील _ हरिवंशराय बच्चन हे हिंदी साहित्यातील ख्यातनामकवी होते.
त्यांच्या आईचे नाव तेजी बच्चन.
अमिताभ बच्चन यांचे शिक्षण अलाहाबादच्या ज्ञानप्रबोधिनी आणि बॉईज हायस्कूल येथे, तर महाविद्यालयीन शिक्षण
नैनितालच्याशेरवूड महाविद्यालयात झाले आणि त्यानंतर दिल्लीच्या किरोडीमल महाविद्यालयातून
त्यांनी विज्ञानाची पदवी संपादन केली.
त्यांनी आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीला कोलकातायेथे एका कंपनीत काम केले.
नंतर चित्रपटात संधी शोधण्यासाठी ते मुंबईत दाखल झाले.
मुंबईत त्यांना ख्वाजा अहमद अब्बास यांच्या सात हिंदुस्थानी (१९६९) या चित्रपटातसर्वप्रथम भूमिका मिळाली.
त्यानंतर हृषीकेश मुखर्जी दिग्दर्शित आनंद (१९७१) या चित्रपटात त्यावेळचे लोकप्रिय सुपरस्टार कलाकार राजेश खन्ना
यांच्या समवेत काम करण्याचीत्यांना संधी मिळाली.
त्यांनी आनंदमधील भूमिकेचे सोने केले. त्यावर्षीचा सर्वोष्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही त्यांना मिळाला.
नमकहराम (१९७२, दिग्द.हृषीकेश मुखर्जी) या चित्रपटातील त्यांची भूमिकाही लक्षवेधी ठरली.
त्या पाठोपाठ आलेला जंजीर (१९७३, दिग्द. प्रकाश मेहरा) चित्रपटातील पोलीस इन्स्पेक्टरची
त्यांची भूमिकाविशेष गाजली आणि येथूनच त्यांची संतप्त तरुणाची (अंग्री यंग मॅन) प्रतिमा जनमानसात प्रस्थापित झाली.
प्रचलित समाजव्यवस्थेच्याविरोधात बंडखोरी व क्रोध व्यक्त करणाऱ्यासंतप्त युवकाचे प्रतिनिधित्व त्यांनी पडद्यावर
आपल्या भूमिकांद्वारे केले. त्यामुळे त्यांच्या भूमिका रसिकांना आपल्याशा वाटल्या. उंच शरीरयष्टी, भेदक डोळे,
भारदस्त घनगंभीरआवाज आणि
गहिरी भावगर्भ अभिनयशैली यांमुळे बच्चन यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ते लवकरच ‘सुपरस्टार’ (अभिनय सम्राट) पदावर पोचले व रूपेरी पडद्यावरजणू अमिताभ युग सुरू झाले.
आजतागायत त्यांच्याइतकी लोकप्रियता अन्य कोणत्याही अभिनेत्याला लाभलेली नाही. बच्चन हे त्यांच्या काळात
भारतातील सर्वाधिक मानधनघेणारे अभिनेते होते. अमिताभ बच्चन चित्रपटात असले म्हणजे चित्रपट
आर्थिक दृष्ट्याही फायदेशीर ठरणार, असा चित्रपट उद्योगाचा वर्षानुवर्षांचा अनुभव होता.
आतापर्यंत त्यांनीसुमारे १६८ चित्रपटांतून भूमिका केल्या असून त्यांचे मनमोहन देसाई, प्रकाश मेहरा,
यश चोप्रा यांसारख्या दिग्दर्शकांबरोबर केलेले चित्रपट विशेष गाजले. त्यांच्या यशस्वी,
लोकप्रियचित्रपटांत अभिमान (१९७३, दिग्द. हृषिकेश मुखर्जी), दीवार (१९७५, दिग्द. यश चोप्रा),
शोले (१९७५, दिग्द. रमेश सिप्पी), कभी कभी (१९७६, दिग्द. यश चोप्रा),
अमर अकबर अँथनी(१९७६, दिग्द. मनमोहन देसाई), मुकद्दर का सिकंदर (१९७८, दिग्द. प्रकाश मेहरा),
त्रिशूल (१९७८, दिग्द. यश चोप्रा), डॉन (१९७८, दिग्द. चंद्रा बारोट), काला पत्थर (१९७९, दिग्द. यशचोप्रा),
नसीब (१९८०, दिग्द. मनमोहन देसाई), लावारीस (१९८१, दिग्द. प्रकाश मेहरा), सिलसिला (१९८१, दिग्द. यश चोप्रा),
नमकहलाल (१९८२, दिग्द. प्रकाश मेहरा), कुली (१९८३, दिग्द. मनमोहन देसाई), शराबी (१९८४, दिग्द. प्रकाश मेहरा),
अग्निपथ (१९९०,दिग्द. मुकुल आनंद) यांसारख्या अनेक चित्रपटांचा उल्लेख करता येईल. बच्चन यांनी १९ चित्रपटांसाठी पार्श्वगायनही केले आहे. मि. नटवरलाल या चित्रपटातील पार्श्वगायनासाठी
त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे. धीरगंभीर, भारदस्त आवाजहे बच्चन यांचे आणखी एक वैशिष्ट्य.
आपल्या भारदस्त आवाजाचा वापर त्यांनी
भूमिका साकारताना तर केलाच, शिवाय काही चित्रपटांना त्यांनी आपल्या भारदस्त आवाजातपार्श्व-निवेदनही दिले आहे. त्यांत भुवनशोम (१९६९, दिग्द. मृणाल सेन), शतरंज के खिलाडी (१९७८, दिग्द. सत्यजित रे),
लगान (दिग्द. आशुतोष गोवारीकर) आदी चित्रपटांचाउल्लेख करता येईल.
ज्येष्ठ अभिनेत्री व खासदार जया बच्चन (भादुरी) या त्यांच्या पत्नी होत. १९७३ मध्ये त्यांचा विवाह झाला.
त्यांचे पुत्र अभिषेक बच्चन व सून ऐश्वर्या राय हेही हिंदी चित्रपटसृष्टीतीलआघाडीचे सुप्रसिद्ध कलावंत होत.




१९८४ मध्ये ते अलाहाबाद लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. त्यांचे मताधिक्यही विक्रमी ठरले.
राजकारणातली त्यांची कारकीर्द मात्र त्यांना मानवली नाही.तीन वर्षांनंतर त्यांनी आपल्या खासदारकीचा राजिनामा दिला.
त्यांच्या लोकप्रियतेचे एक उदाहरण म्हणजे, १९८२ साली कुली या चित्रपटाच्या चित्रीकरणाप्रसंगी त्यांना अपघातझाल्याने
त्यांची प्रकृती गंभीर झाली; त्यावेळी त्यांच्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी देशभर प्रार्थना, नवस केले व शुभेच्छा दिल्या.

आतापर्यंत त्यांना १४ वेळा फिल्मफेअर पुरस्कार, तर दोन वेळा उत्कृष्ट अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून,
भारत सरकारने त्यांना पद्मभूषण व पद्मविभूषण याकिताबांनी गौरविले आहे.
या शिवाय अनेक मानद उपाध्याही त्यांना मिळाल्या आहेत.
विदेशांतही त्यांचे सन्मान झाले आहेत.
त्यांनी १९९६ मध्ये ‘ए बी सी एल्’ (अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लि.) ही चित्रपटनिर्मितिसंस्था स्थापन केली होती.
आर्थिक नुकसानीमुळे त्यांना ती बंद करावी लागली.
२००० मध्ये’कौन बनेगा करोडपती’ या दूरचित्रवाणीवरील प्रश्नमंजुषा मालिकेने त्यांच्या लोकप्रियतेत अधिकच भर घातली.
दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कसे करावे, याचा आदर्शवस्तुपाठच बच्चन यांनी आपल्या निवेदनानेघालून दिला.
आजही ही मालिका भारतीय दूरचित्रवाणीच्या इतिहासातील सर्वाधिक लोकप्रिय व
वाहिन्यांना सर्वाधिक उत्पन्न मिळवूनदेणारी मालिका म्हणून ओळखली जाते.
प्रारंभी स्टार टीव्हीवर व नंतर सोनी टीव्हीवर ही मालिका आजही सुरू आहे. वाढत्या वयानुसार बच्चन यांनी
आपल्या भूमिकांचा बाजबदलला असला, तरी त्यांचा अभिनय उत्तरोत्तर अधिकाधिक परिपक्व होत गेलेला दिसून येतो.
मोहब्बते (२०००),
कभी खुशी कभी गम (२००१), बागबान (२००३), ब्लॅक (२००५), सरकारराज (२००८), पा (२००९) इ. चित्रपटांचा
या संदर्भात उल्लेख करता येईल.

अमिताभ बच्चन यांची कारकीर्द अद्यापही चालू असून वयाच्या सत्तरीतही ते तरुणांना लाजवेल अशा उत्साहात कार्यरत आहेत.
त्यांचे एकूण व्यक्तिमत्त्व अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.




अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण!!!




लहानपणी शाळे मधे
एकच ड्रेस असायचा……
खाकी चड्डी पांढरा सदरा प्रत्येकाच्या अंगावर दिसायचा…
👨‍👨‍👦‍👦👨‍👨‍👦‍👦👨‍👨‍👦‍👦👨‍👨‍👦‍👦👨‍👨‍👦‍👦👨‍👨‍👦‍👦👨‍👨‍👦‍👦👨‍👨‍👦‍👦
पायात चप्पल असणं
ही लक्झरी असायची……
गावात एखाद्या कडेच
“बाटाची”चप्पल दिसायची!
👡👡

रेशनच्या दुकानावर
लोकं चकरा मारायचे…..🏃🏼🏃🏿
तेव्हा कुठं वायरच्या पिशवीत किलोभर साखर आणायचे !🚶

वरच्या वर्गात जाताना
पुस्तक जुनेच असायचे 📓
शुभंकरोती आणि बे एक बे मात्र पोरं घरोघरी म्हणायचे !😲🙏

सडा, सारवण, धुणं, भांडी
बायकांना तर आरामच नव्हता😰
ज्याच्याकडे ‘ पाणी तापवायचा बंब ‘तोच सगळ्यात श्रीमंत होता !🤓

दिवाळीच्या फराळाला
सर्वांनी एकत्र बसायचं
खोबर्याच्या तेला मधे
वासाच तेल असायचं !!😙




कुठला मोती साबण
अन कशाची काजू कतली 🍕
माया, प्रेम एवढं होतं की
गोड लागायची वातड चकली !!🤗

भात, पोळी , गोडधोड
सणासुदिलाच व्हायचे
पाहुण्याला गरम आणि
घरच्याला गार पोळी वाढायचे !😌

पिझ्झा , बर्गर , न्यूडल्स आजकाल रूटीन असतं🍵🍝🍲
गरीबीला लपवणं
फारच कठिण असतं

स्वयंपाक घरात आता भरपूर
किराणा भरलेला असतो 🍎🍇🍌
खाऊ घालायची वासनाच नाही
म्हणून लोणच्याला भुरा येतो?

हल्ली आता प्रत्येकाच्ं
पैकेज फक्त मोठ्ठ असतं 💰
दिवाळीच्या दिवशी सुद्धा
पॉश घर “भकास ” वाटतं ?🏠

का बरे पहिल्यासारखे
पाहुणे आता येत नाहीत?🤔
हसण्याचे आणि खिदळण्याचे आवाज कानावर येत नाहीत?
😉😆😅😂?🗣

काय तर म्हणे आम्ही आता
हाय फाय झालो !
चार पैसे आल्यामूळे, खरंतर
सगळेच पुरते वाया गेलो !!

कशामुळे घात झाला
काहीच का कळंत नाही ?
एवढं मात्र खरं की
पहिल्यासारखं
सुख आता अजिबात मिळत नाही !?😪

प्रगती झाली की अधोगती ?
काहीच उमजेना !??
माणसाला माणसा कडून
अजिबात प्रेम मिळेना ?💔

अहंकार कुरवाळल्याने
प्रेमाचे झरे आटलेत
अन् आधार गमावल्यामुळें
” सायकियाट्रिक ” जवळचे झालेत !!?

भ्रमामध्ये राहु नका
जागं व्हा थोडं
माणसा शिवाय माणसाचं
सुटत नसतं कोडं!
जीवनात दोन गोष्टी वाया जाऊ
द्यायच्या नाहीत,,,
👏👏👏👏👏👏👏👏 अन्नाचा कण
आणि
आनंदाचा क्षण




अप्रूप …..जुन्या आठवणी





परवा बऱ्याच वर्षांनी माझ्या शाळेत गेलो होतो … फिरता फिरता एक कपाट नजरेस पडलं…… वर लिहिलं होतं .. “हरवले सापडले विभाग” ….. तीच पूर्वीची
जागा .. कपाटही तेच असावं बहुधा …. पण आज ते खूपच खिन्न वाटत होतं …. सुरवातीला वाटलं की कपाटाच्या वयोमानामुळे असेल … पण नंतर नजर त्या कपाटातल्या वस्तूंवर गेली आणि मग त्याची उद्विग्नता नेमकी कशामुळे होती याचा अंदाज आला … आत इतक्या वेगवेगळ्या महागड्या वस्तू , Tupper ware च्या बाटल्या , रुमाल , चित्रकलेच्या वस्तू , पेनं , key chains, कंपास , पेन्सीलचा तर खचंच पडला होता ……. शाळेतल्या बाईंना विचारलं तर त्या म्हणाल्या, आज काल मुलं आपली वस्तू हरवली की विचारतच नाहीत .
कित्येकदा आम्ही वर्गावर्गात जाऊन विचारतो तरी आमचं नाही असं म्हणतात .

कदाचित घरी गेल्यावर ती वस्तू काही मिनिटात त्यांच्या हातात येऊन पडत असेल . याला कारणं अनेक असतील. उंचावलेला आर्थिक स्तर , जे आपल्याला मिळालं नाही तर ते आपल्या मुलांना मिळावं ही वारसा हक्कानी मिळालेली विचारसरणी, कुटुंब छोटी झाल्याने एकाच्याच वाट्याला येणारे सगळे लाड आणि अशी अनेक कारणं …. ही कारणं त्या त्या ठिकाणी योग्य असतीलही…….पण ….

पूर्वी आमचा साधा Eraser जरी शाळेत विसरला ज्याला त्या काळी आम्ही “खोड रबर “ म्हणायचो , तरी दुसऱ्या दिवशी तो याच हरवले सापडले विभागाच्या कपाटात ‘याची देही याची डोळा’ बघत नाही तो पर्यंत होणारी घालमेल , मग ती वस्तू आपलीच कशी आहे , त्यावर पेनानी काढलेला star मीच काढला होता हे पटवून देण्यासाठीची धडपड …. त्यासाठी वेळप्रसंगी मधल्या सुट्टीत वर्गातून आयात करावे लागणारे साक्षीदार …. आणि शेवटी ती हरवलेली वस्तू पुन्हा आपल्या हातात पडली की मिळणारे समाधान …. अशा अनेक गोष्टींमधली गंमत ही आजकालच्या मुलांना माहितीच नाहीये . आम्ही एका वेळेस १-२ पेन्सिल्स घ्यायचो , आता अख्खा box घेतो … आधीच्या वर्षीच्या वह्यांमधली उरलेली पानं फाडून त्याचं binding करुन ती रफ वही म्हणून आनंदानी वापरायचो आता वेगवेगळ्या design च्या वह्या घेतो …… जुन्या जाड कॅलेंडर ची पानं कव्हर म्हणून घालायचो आता Plastic Coated वगैरे वगैरे … एकंदरीत लक्षात आलं कि आजकालच्या मुलांना कसलं अप्रूपच राहिलं नाहीये . अप्रूप ………..खरंच… सगळ्याच्या व्याख्याच बदलल्यात आता …… पण या घटनेनी मला मात्र Flashback मध्ये नेलं…




खडूंचा पूर्ण भरलेला box बघण्याचं अप्रूप …..
तो रंगीत खडूंचा असेल तर जरा जास्तंच अप्रूप……
बाईंनी खडू आणायला पाठवलेल्या मुलाने हळूंच खिशातून स्वतःसाठी आणलेला एक खडू सगळ्या वर्गाला World Cup जिंकल्याच्या थाटात दाखवण्याचं अप्रूप…..
धडपडल्यावर गुलाबी-लाल रंगाचं औषध लावून घेण्याचं अप्रूप…..
Lab मधल्या काकांना मस्का मारून Litmus Paper ढापण्याचं अप्रूप….
हस्तकलेच्या वेळेस हाताला चिकटून वाळलेल्या फेविकॉलचे पापुद्रे काढण्याचं अप्रूप……
स्पोर्ट्स च्या वेळेस एखाद्याला काही कारणास्तव ग्लुकॉन डी दिलं कि त्याचं अप्रूप….
gathering च्या practice साठी एकाचा टेप रेकॉर्डर घेऊन दुसऱ्याच्या घरी जाण्याचं अप्रूप….आणि बरंच काही…

आजच्या जमान्यात “फालतू” वाटणाऱ्या अशा अनेक साध्या साध्या गोष्टी आम्ही जगलो होतो आणि खूप enjoy केल्या होत्या .

त्या हरवले सापडले कपाटातल्या हरवलेल्या वस्तू त्या त्या मुलांना सापडल्या नसल्या तरी मला मात्र त्या कपाटामुळे माझ्या “हरवलेल्या अनेक जुन्या आठवणी सापडल्या” …

तेवढ्यात लक्ष घड्याळ्याकडे गेलं … मी भूतकाळातून वर्तमानात आलो आणि लगेच तिकडून निघालो … बाहेर एक मित्र भेटला …. घाईत होता … त्याचा मुलगा काल शाळेत colour box हरवून आला होता .. त्यामुळे नवीन घ्यायला चालला होता …..

क्षितिज दाते



Poem on Ganapati — Very True




काल रात्री गणपती बाप्पा
होता टिळकांशी भांडत,
आपल्या अडचणींची कैफियत
होता पोटतिडकीने मांडत ||

देवघरातून तू मला
बाहेर का आणलंस ?
तुमच्या लाडक्या देवाचं कौतुक
कशाला चार-चौघात मांडलंस ?

गायलास तू सुरुवातीला
ताल-सुरात आरत्या,
केलीस साधी फुलांची आरास
भोवती रंगीत बत्त्या.

खूप मस्त छान असायचं
आनंद वाटायचा येण्यात,
सुख-शांती-समाधान मिळे
चैतन्य तुला देण्यात.

दहा दिवस उत्सवाचे म्हणजे
असे, दिव्यत्वाची रंगत…
काल रात्री गणपती बाप्पा
होता, टिळकांशी भांडत ||

पूर्वी प्रवचन, कीर्तन, गायनाने
मंगलमयी वाटायचे,
प्रबोधक, उद्बोधक भाषणांनी
विचार उंची गाठायचे.

आत्ता सारखा हिडीसपणा
मुळीच नव्हता तेव्हा,
शांताबाईच्याच नावाचा
आता अखंड धावा.

पीतांबर, शेला, मुकुट
हे माझे खरे रुप,
शर्ट, पँट, टोपी, पागोटे
धिगाण्याला फक्त हुरूप.

शाडूची माती… नैसर्गिक रंग
गायब आता झाले कुठे ?
लायटिंग केलेल्या देखाव्याने
मला दरदरून घाम फुटे !

श्रध्दा, भक्तीभाव, आदर मनीचा
गेला ना रे सांडत…
काल रात्री गणपती बाप्पा
होता, टिळकांशी भांडत ||

माणसां-माणसांनी एकत्र यावे
एकमेकांना समजुन घ्यावे,
देव-घेव विचारांची करतांना
सारे कसे एक व्हावे.

जातीभेद नसावा…
बंधुभाव असावा,
सहिष्णुतेच्या विचारांनी
नवा गाव वसावा.

मनातला विचार तुझ्या
खरंच होता मोठा,
पण, आज मात्र खऱ्या विचारांनाच
बघ मिळालाय फाटा.

पूर्वी विचारांबरोबर असायची
खाण्यापिण्याचीही रेलचेल,
आता मात्र देखाव्यांमागे
दडलेला असतो काळा खेळ.

पूर्वी बदल म्हणून असायचे
पोहे-चिवडा-चहा-काॅफी…
साग्रसंगीत जेवणा सोबत
लाडू-मोदक-पेढे-बर्फी.

आता, रात्री भरले जातात
पडद्यामागे, मद्याचे पेले
डी. जे. वर नाचत असतात
माजलेले दादांचे चेले.

नको पडूस तू असल्या फंदात
तेव्हाच मी होतो सांगत…
काल रात्री गणपती बाप्पा
होते, टिळकांशी भांडत ||

कशासाठी उत्सव असा
सांग ना रे बांधलास ?
देवघरातून गल्लोगल्ली
डाव माझा मांडलास !

दहा दिवस कानठळ्यांनी
होतो मला आजार,
व्यवहारी दुनिया इथली,
इथे चालतो लाखोंचा बाजार.

रितीरिवाज, आदर-सत्कार,
मांगल्याचा नाही पत्ता,
देवघरा ऐवजी माझा
रस्त्यावरती समजतो कट्टा.

जुगार-दारु-सट्टा-मट्टा –
अनैतिकतेला येतो ऊत,
देवा ऐवजी दैत्याचेच मग
मानेवरती चढते भूत.

सामाजिक बाजू सोडून सुटतो
राजकारणालाच इथे पेव,
गौरी-गणपती सण म्हणजे –
गैरव्यवहाराची ठेव-रेव.

नको रे बाबा, नको मला हा
मोठेपणाचा तुझा उत्सव,
मला आपले तू माझ्या जागी
परत एकदा नेऊन बसव.

कर बाबा कर माझी सुटका
नको मला ह्यांची संगत…
काल रात्री गणपती बाप्पा
होता, टिळकांशी भांडत ||

आपल्या अडचणींची कैफियत
होता पोटतिडकीने मांडत,
काल रात्री गणपती बाप्पा
होता, टिळकांशी भांडत ||




Stop Dreaming Start Gyming




व्यायाम करणे हि कला
स्थुलतेची टाळे बला
अजूनही आपल्या देशात व्यायामाला समानार्थी शब्द आहे कंटाळा !
हाss हाsss
काय झालं हसू आलं ना?

पण हेच वास्तव आहे. व्यायाम करण्यापेक्षा तो टाळण जास्त सोप्प आहे असं आजही बहुतांशी लोकांना वाटत. पण लक्षात घ्या इथेच आपण चुकतो. व्यायामाला जगात पर्याय नाही. सर्व साधारण पणे लोकांना व्यायाम टाळण्यासाठी खालील कारणे द्यायला आवडते –
1. माझे शेड्यूल खूप बिझी असते त्यामुळे मी व्यायाम करूच शकत नाही

2. मला खूप घरकाम असते, मला व्यायामाची गरजच नाही (हे विशेषत: स्त्रियांच्या बाबतीत )

3. मला रात्री झोपच येत नाही मग मी सकाळी उशिरापर्यंत झोपायलाच हवे, त्याशिवाय झोप कशी पूर्ण होणार

4. मला तर शिफ्ट ड्युटी असते माझा ताळमेळ जमतच नाही

5. माझे कंपनीत खूप चालणे होते त्यामुळे मला व्यायामाची गरज नाही

6. व्यायाम केला कि माझे अंग दुखते

7. मी तर रोज ४ कि.मि. चालतो /चालते पण माझे वजन काही कमी होत नाही, लठ्ठपणा हि माझी टेंडन्सी आहे.

8. मी मुळात जेवणच खूप कमी करते आणि माझे आठवड्यातून ३ उपास असतात त्यामुळे मी व्यायाम नाही केला तरी चालतो.

9. मला डॉक्टरांनी व्यायाम करायचा नाही असे सांगितले आहे

खरोखरीच हि कारणे ऐकून समोरच्याची कीव येते. व्यायाम हि एक कला तर आहेच पण व्यायाम हा फार चतुराईने आणि स्मार्ट पणे करायला हवा तरच त्याचा योग्य तो फायदा आपल्याला मिळतो. स्नायूंचे बळ वाढवायचा, वजन वाढवायचा, वजन कमी करण्याचा, एखादा आजार बरा करण्याचा, मन शांत करण्याचा, हृदय मजबूत करण्याचा, फुफ्फुसांची शक्ती वाढवायचा, सौष्ठव मिळवण्याचा, फिगर बनवण्याचा इतकच काय तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा असे व्यायामाचे प्रकार आहेत. आणि हे सगळ स्मार्ट व्यायामाने शक्य आहे. खाली मी काही स्मार्ट व्यायामाच्या टिप्स दिल्या आहेत –

1. सुरुवातीला तुम्हाला किती वेळ व्यायामासाठी देणे शक्य आहे ते ठरवा. हि वेळ सुरुवातीला अगदी १५ मि पण पुरेशी आहे.

2. व्यायाम करताना हृदयाची गती वाढवणे व शांत करणे या दोन्ही गोष्टी आल्याच पाहिजे

3. चालणे हा शरीरासाठी व्यायाम नाही. तुमच्या जर पोटावर कमरेवर चरबी असेल तर त्यासाठी काही स्ट्रेचिंग करणे आवश्यक आहे.

4. आपल्या जीवनशैलीनुसार व्यायाम बदला. जर आपण सतत समोर वाकून काम करत असाल तर आपल्याला मागे वाकणारे व्यायाम आवश्यक आहेत हे लक्षात घ्या.

5. घरकाम म्हणजे व्यायाम नाही (स्त्रियांनी हे विशेष लक्षात घ्यावे ). घरकामाने आपण थकतो, व्यायामाने आपण प्रसन्न होतो.

6. व्यायाम आज केला तर त्याचा फायदा आजच मिळतो, त्यामुळे रोज व्यायाम करावा.

7. व्यायामात कायम बदल करावा. व्यायाम हा कॉम्बीनेशन मधे करावा. म्हणजे कधी दोरीच्या उड्या आणि योगा, तर कधी धावणे चालणे व पॉवर योगा, कधी फक्त योगा आणि मेडीटेशन, सुटीच्या दिवशी डोंगर चढणे.

8. नुसताच व्यायाम नाही तर रोजच्या हालचाली पण वाढवणे गरजेचे असते. जसे जिना चढणे उतरणे, स्वतः पाणी प्यायला जाणे, जड वस्तू उचलणे, घराची साफ सफाई करणे.

9. हल्ली आपल्याला मानसिक थकवा खूप येतो. पण लक्षात घ्या मानसिक थकवा घालवण्यासाठी शारीरिक थकवा खूप आवश्यक असतो.

10. आपल्याला हव्या त्या वेळी, हवा तेवढा वेळ व्यायाम करता येतो. माणूस श्रीमंत असो कि गरीब त्याला दिवस हा २४ तासांचाच मिळतो हे लक्षात घ्या, आपल्यापेक्षा फिल्मस्टार आणि बिझनेसमन हे खूप बिझी असतात परंतु ते वेळेचे नियोजन करून व्यायामासाठी वेळ काढतात आणि आपण मात्र कारणे देतो.

व्यायामाच्या आणि आहाराची योग्य धरा कास
नाहीतर शरीरामध्ये आपल्या रोगाचा होईल वास
कदान्न खाण्याचा करू नका हव्यास
सुडौल शरीराचा घ्या जरा ध्यास !!




Ganesh Puja Or Pooja Samagri (Item) List

Ganesh Puja Or Pooja Samagri (Item) List

1. Murti (Clay model of Ganpati)
2. Ganesh Patri (Sacred leaves) Kumkum (Red powder)
3. Mithai (Modak) (Sweets)
4. Haldi (Turmeric)
5. Supari (Betalnut)
6. 5 Types of Fruits (Mango, Banana, Apple, Orange, Grapes, Pear, and Peach)
7. Nariyal (Coconut)
8. Flowers
9. Chawal (Rice)
10. Laung (Cloves)
11. Elaichi (Green Cardamom)
12. Chandan (Sandal)
13. Mauli (Red Holy Thread) – Thread
14. Kapur (Camphor)
15. Sindoor (Vermilion)
16. Gangajal (Scared water of Ganges)
17. Gulab jal ( Rose water)
18. Janeu (Sacred thread)
19. Gulal (Pink Powder)
20. Panchamrut (Mixture of Milk, Curd, Honey, Sugar, Ghee)
21. Gnehu (Wheat)
22. Navrathna Oil
23. Kalash made of Silver, Copper or Stainless Steel (Water jug)
24. Kumkum (Red powder)
25. Cloth for Kalash (Handkerchief, Napkin)
26. Saree, Petticoat, Blouse ( Saree, Underskirt, Blouse piece)
27. Laal Kapda (Red cloth)
28. Safed Kapda (White cloth)
29. Kachha Dhudh (Un-boiled milk)
30. Paan Leaves

Pune to Malshej ghat, Shivenri fort and Lenyadri Ganpati

Malshej ghat
Malshej Ghat is a mountain pass in the Western Ghats range in the Thane-Pune district of Maharashtra, India.
The site is nestled in the lofty rugged hills of the Western Ghats.
The site is home to hundreds of different kinds of flora and fauna especially the avian population such as quails, rails, crakes, flamingos and cuckoos.
Pune to Malshej ghat distance:
It is around 138 KM from Pune.

State Bus Station is right next to the railway station. Any Ahmednagar Bound Bus will stop at Malshej Ghat.
From Kalyan Rail Station, one can take state buses that commute frequently between Kalyan and Ahmednagar.
It will approximately take 1.5 hrs by Bus from Kalyan.

Route From Pune :
Hadapsar -> Vishrantwadi -> Bhoseri -> Rajgurunagar -> Manchar -> Narayangoan -> Junnar -> Malshej Ghat

Map

Best Time to Visit:
July to September(Monsoon season)

Other places:

  • Shivneri fort
  • Lenyadri Ganpati
  • Ozar Ganpati

 

My Experience at passport office pune





Applied for passport online and took printout of the application form.

At Entrance gate:
1. Entry is based on time slot. You need to reach half an hour early.
2. Once u enter office, at office door, they verify your application form for name
3. After you walk through door, you will see counter’s in front where you need to show the application form and document xerox. They will provide token number.
4. After that we need to walk to 3 different counters A, B and C.
A – Document scanning, photo for passport, and finger prints
B – Re verification of document
C – Stamping of form and signature.

Exit Counter
1. Submit the token form and get the receipt.

Documents needed:
Carry all the required document in original
Carry xerox of all original document with self attested.

Parking:
There are multiple parking spaces available. For 2 wheeler you can park in front of passport seva kendra gate.

Time taken for reissue of passport:
I applied on Friday and received the passport on Wednesday next week.




मराठी युवा उद्योजक उद्योगिनी समूह, महाराष्ट्र




मराठी युवा उद्योजक उद्योगिनी समूह, महाराष्ट्र
1. गाई-म्हशी विकत घेणे –
प्रकल्प खर्च – ६ लाख – १० जनावरे
(शासकीय योजना – २५ % ओपन कॅटेगरी साठी ३३.३३% एस सी/एस टी साठी )
2. शेळीपालन –
प्रकल्प खर्च ४.५ लाख – ५० शेळ्या २ बोकड
(शासकीय योजना – २५ % ओपन कॅटेगरी ३३.३३% एस सी –एस टी)
3. कुक्कुटपालन –
प्रकल्प खर्च – ८ लाख -५००० पक्षी
(शासकीय योजना २५ % ओपन कॅटेगरी ३३.३३% एस सी –एस टी)
4. शेडनेट हाऊस –
प्रकल्प खर्च – ३.५ लाख – १० गुंठे
(शासकीय योजना – ५० % )
5. पॉलीहाउस –
प्रकल्प खर्च -११ लाख – १० गुंठे
(शासकीय योजना – ५० % )
6. मिनी डाळ मिल –
प्रकल्प खर्च -१.८८ लाख
(शासकीय योजना – ५० % )
7. मिनी ओईल मिल –
प्रकल्प खर्च -५ लाख
(शासकीय योजना – ५० % )
8. पॅकिंग व ग्रेडिंग सेटर-
३५ % सर्वसाधारण क्षेत्रासाठी अनुदान (१७.५० लाख प्रती आकार ९*८ मी.
9. ट्रॅक्टर व अवजारे –
प्रकार १- (शासकीय योजना-०८ ते २० PTOHP रुपये १ लाख अनुदान /३५ % -अनु.जाती,अनु.जमा
ती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी
प्रकार २-(शासकीय योजना-२० ते ७० PTOHP रुपये ७५ हजार अनुदान /२५ % -इतर लाभधारकांसाठी )
10. पॉवर टिलर -८ बीएचपी च्या कमी
प्रकार १- (शासकीय योजना-५००००/- अनुदान /
५० % -अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी
प्रकार २-(शासकीय योजना-४० हजार अनुदान /४० % -इतर लाभधारकांसाठी )
11. पॉवर टिलर -८ बीएचपी च्या जास्त
प्रकार १- (शासकीय योजना-७५ हजार /- अनुदान /५० % -अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी
प्रकार २-(शासकीय योजना-६० हजार अनुदान /४० % -इतर लाभधारकांसाठी )
12. काढणी व बांधणी यंत्र –
शासकीय योजना –रुपये १.२५ लाख ( ५० % )
13. रोटाव्हेटर-२० बीएचपी खालील चलित
प्रकार १- (शासकीय योजना-३५ हजार /- अनुदान अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी
प्रकार २-(शासकीय योजना-२८ हजार अनुदान -इतर लाभधारकांसाठी
रोटाव्हेटर-२० बीएचपी वरील चलित
प्रकार १- (शासकीय योजना-४४ हजार /- अनुदान अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी
प्रकार २-(शासकीय योजना-३५ हजार अनुदान -इतर लाभधारकांसाठी
14. कडबा कुट्टी यंत्र/ पेरणी यंत्र-
२० बीएचपी खालील चलित
प्रकार १- (शासकीय योजना-१५ हजार /- अनुदान अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी
प्रकार २-(शासकीय योजना-१२ हजार अनुदान -इतर लाभधारकांसाठी
२० बीएचपी वरील चलित
प्रकार १- (शासकीय योजना-१९ हजार /- अनुदान अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी
प्रकार २-(शासकीय योजना-१५ हजार अनुदान -इतर लाभधारकांसाठी
15. उच्च तंत्रज्ञानावर आधारित रोपवाटिका –( किमान २ ते ४ हेक्टर क्षेत्र युनिटसाठी )
अनुदान – ४०% भांडवलाच्या निगडीत २५ लाख प्रती हेक्टर
16. छोट्या रोपवाटिका साठी -–( १ हेक्टर क्षेत्र युनिटसाठी )
अनुदान – ५० भांडवलाच्या निगडीत १५ लाख प्रती हेक्टर
17. गोडाऊन(वेअर हाउस)-
प्रकल्प खर्च-३५ लाख -१००० मे. टन
(शासकीय योजना-२५ %)
18. शीत गृह –५००० मेट्रिक टन साठी
(शासकीय योजना-३५ % अनुदान सर्वसाधारण क्षेत्रासाठी /५०% आदिवासी आणि डोंगराळ भागासाठी )
२८०० प्रती मे .टन प्रकार १ साठी
३५०० प्रती मे .टन प्रकार २ साठी.
19. गांडूळ खत प्रकल्प –
प्रकल्प खर्च-६०० घनफूट प्रोरीत धरतीवरती
(शासकीय योजना-५००००/- प्रती उत्पादन प्रकल्प
20. उसाच गुऱ्हाळ –
प्रकल्प खर्च- १४ लाख
(शासकीय योजना- ५० %)
21. फळ प्रक्रिया उद्योग –
प्रकल्प खर्च- २४ लाख
(शासकीय योजना – ४० %)
22. फळबाग लागवड (एन.एच.बी.)-
प्रकल्प खर्च- २० लाख – १० एकर
(शासकीय योजना- ४० %)
23. स्पिरुलीना (शेवाळ शेती)-
प्रकल्प खर्च- ४.५ लाख
(शासकीय योजना – ५० % )
24. भाजीपाला सुकवणे-
प्रकल्प खर्च-२४ लाख
(शासकीय योजना-४० %)
25. कृषि सल्ला व सेवा केंद्र –
प्रकल्प खर्च-५ लाख
(शासकीय योजना-४०%)
26. सोयाबीन मिल्क व उत्पादने-
प्रकल्प खर्च- ८ लाख
(शासकीय योजना- ४० %)
27. कृषी पर्यटन (अॅग्रो टूरीझम)- प्रकल्प खर्च-१० लाख